प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी मुफ्ती सलमान अजहरींना अटक

  106

मुंबई: गुजरातच्या जुनागढमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्या प्रकरणी गुजरात एटीएसकडून रविवारी मुंबईचे इस्लाम अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी यांना अटक करण्यात आली. यादम्यान, त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली. जुनागढ येथे काही दिवसांपूर्वी दिलेल्या भाषणात गुजरात पोलिसांनी मुस्लिम मौलाना आणि इतर दोन लोकांविरोधात एफआयआर दाखल केला होता.पोलिसांनी मुफ्ती सलमान अजहरी यांना ताब्यात घेतले.


मुफ्ती सलमान अजहरी यांना मुंबईच्या घाटकोपर स्टेशन येथे ठेवण्यात आले. यावेळेस पोलीस ठाण्याच्या बाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मौलाना यांच्या वकिलांचे म्हणणे आहे की मुफ्ती सलमान तपासात संपूर्ण मदत करण्यास तयार आहेत.



समर्थकांना आंदोलन न करण्याचे अपील


दिवसाच्या वेळेस मुफ्ती सलमान अजहरी यांचे सोशल मीडिया हँडलवरून अनेक ट्वीट्स करण्यात आले. यात एकामध्ये म्हटले त्यांना गुजरात एटीएस, मुंबई एटीएस आणि चिराग नगर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सकाळी ११.५६ वाजता ताब्यात घेतले.


दरम्यान, प्रक्षोभक भाषण प्रकरणात आपल्या समर्थकांनी कोणत्याही प्रकारचे आंदोलन करू नये असे अपील करताना मौलाना दिसले.



काय आहे संपूर्ण प्रकरण?


मौलाना यांच्यावर ३१ जानेवारीला जुनागढ येथील एका कार्यक्रमादरम्यान प्रक्षोभक भाषण दिले असा आरोप आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुफ्ती सलमान, कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद युसुफ मलिक आणि अजीम हबीब ओडेदरा यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १५३ बी आणि ५०५(२) अंतर्गत एफआयआर दाखल केला.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.