Loksabha Election : निवडणूक प्रचारात लहान मुलं दिसली तर बालमजुरी कायद्यांतर्गत होणार कारवाई

काय आहे निवडणूक आयोगाचा नियम?


नवी दिल्ली : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे (Loksabha Election) वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी (Political Parties) कंबर कसली आहे तर निवडणुकीची तारीख जाहीर होताच जोरदार प्रचारालाही सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) प्रचारासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्यात एक महत्त्वाचा नियम आखून देण्यात आला आहे. या नियमानुसार, कोणत्याही राजकीय पक्षाला निवडणुकीच्या प्रचारादरम्यान लहान मुलांचा प्रचाराच्या कामांसाठी वापर करता येणार नाही. तसे आढळल्यास बालमजुरी (Child Labor) कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.


आज निवडणूक आयोगाने एक पत्रक जारी केले. यात लहान मुले आणि अल्पवयीन मुलांना निवडणूक प्रचारात सहभागी न करण्याच्या कडक सूचना जारी केल्या आहेत. लहान मुले किंवा अल्पवयीनांनी प्रचार पत्रिका वाटताना, पोस्टर्स चिकटवताना, घोषणाबाजी करताना किंवा पक्षाचे झेंडे आणि बॅनर घेऊन फिरताना दिसू नये, असे यात सांगण्यात आले आहे.


निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मुलांना निवडणुकीशी संबंधित कामात किंवा निवडणूक प्रचाराच्या कामात सहभागी करुन घेणे खपवून घेतले जाणार नाही. या सूचनांमध्ये लहान मुलांना कोणत्याही प्रकारच्या राजकीय प्रचारात, मग ते कविता वाचणं, गाणी, घोषणा इत्यादींमध्ये सामील न करण्यास सांगितले आहे.


आयोगाने म्हटले की, कोणत्याही पक्षाच्या निवडणूक प्रचारामध्ये मुलांचा सहभाग असल्याचे आढळले, तर बालमजुरीशी संबंधित सर्व कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल. याबाबत कार्यवाही करण्याची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व रिटर्निंग अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, मुलगा त्याच्या पालकांसोबत तिथे असेल, तर याला मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन मानले जाणार नाही.


Comments
Add Comment

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी

महामार्गावर मोठा अपघात, अवघ्या काही सेकंदात १७ जण होरपळले

चित्रदुर्ग : कर्नाटकमधील चित्रदुर्ग गुरुवारी पहाटे महामार्गावर मोठा अपघात झाला. अवघ्या काही सेकंदात १७ जणांचा

पॅन - आधार लिंक करण्यासाठी शेवटची संधी!

३१ डिसेंबरनंतर भरावा लागेल १००० रुपये दंड नवी दिल्ली : तुम्ही तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड अजूनही लिंक केले

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

दोन नव्या विमान कंपन्यांना केंद्र सरकारची मंजुरी

‘इंडिगो’च्या एकाधिकारशाहीला ब्रेक नवी दिल्ली : जेव्हा देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोची व्यवस्था

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या