Eknath Khadse : एकनाथ खडसेंची मालमत्ता शासनाच्या ताब्यात!

वेळेत दंड भरला नाही तर मालमत्तेचा होणार लिलाव; गिरीश महाजन यांनी दिली माहिती


जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. त्यांची सर्व मालमत्ता (Property) शासनाने आपल्या ताब्यात घेतली आहे. अवैध गौण खनिज उत्खनन केल्या प्रकरणात एकनाथ खडसे यांना १३७ कोटी रुपयांचा दंड (Fine) ठोठावण्यात आला. मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. हा दंड दिलेल्या मुदतीत भरला नाही तर शासनाने ताब्यात घेतलेल्या मालमत्तेचा लिलावही (Auction) केला जाऊ शकतो, अशी शक्यताही गिरीश महाजन यांनी वर्तवली. यामुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले आहेत.


एकनाथ खडसेंनी केलेलं हे कृत्य म्हणजे चोरी नाही, तर शासनावर टाकलेला डाका असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गिरीश महाजन म्हणाले की, “एकनाथ खडसेंनी त्यांच्या कुटुंबियांच्या नावे जमीन घेऊन, त्यातून मुरूम उत्खनन केले. मात्र, त्यांनी रॉयल्टी भरली नाही, कोट्यवधी रुपयांचा मुरूम विकला, सगळा पैसा काळया मार्गाने घेतला. त्यांनी याबाबत रॉयल्टी भरली असल्याचा एकही पुरावा ते देऊ शकले नाही. म्हणून त्यांना १३७ कोटी रुपयांचा दंड करण्यात आला आहे. याबाबत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे. ३५ कोटी रुपयांचा दंड तातडीने त्यांना भरावा लागणार होता. मात्र, त्यांनी तो भरला नाही म्हणून त्यांची सगळी मालमत्ता शासनाने ताब्यात घेतल्याचे आपण वृत्तपत्रात वाचले आहे. येत्या काही दिवसांत त्यांनी हा दंड मुदतीत भरला नाही, तर त्यांच्या संपूर्ण मालमत्तेचा लिलाव केला जाण्याची शक्यता असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.



स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उदाहरण


पुढे बोलतांना महाजन म्हणाले की, “सत्ता असली की आपलं कोणी वाकड करू शकत नाही आणि गेली की काय होते त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यांनी या गोष्टी केल्या असल्या तरी देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन नालायक कसे हे सांगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खडसेंच्या या कृत्यामुळे त्यांचा जावई जेलमध्ये जाऊन आला. स्वार्थ कुठे नेऊन ठेवतो हे त्याचं उदाहरण आहे. खडसे नेहमी इतरांच्या भष्टाचार संदर्भात बोलतात, मात्र खडसे हे स्वतः भ्रष्टाचाराचे कुलगुरू आहेत, आता त्यांना भोगावे लागत असल्याची टीका महाजन यांनी केली आहे.



जे पेरले तेच उगवणार


आपण स्वच्छ असू तरच इतरांना त्रास द्यावा आणि छळ करावा. आपण असे असतांना इतरांकडे बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे राहतात हेही लक्षात ठेवले पाहिजे. सत्ता होती तेव्हा आमच्यावर मोका लावला होता, खोटे गुन्हे दाखल केले होते. आम्ही तर असे काही केलेही नव्हते. आता त्यांनी उत्तर द्यावे की त्यांनी मुरूम कुठे टाकला. जे पेरले तेच उगवणार असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.



खडसे निवडणूक लढवू शकतील का?


खडसेंकडे सरकारी फी बाकी असल्याने त्यांना निवडणूक लढता येईल का, हे निवडणूक आयोग ठरवेल. कारण ग्राम पंचायतीची फी बाकी असली तरी निवडणूक लढता येत नाही, मात्र आपला कायद्याचा अभ्यास नाही, असे म्हणत खडसे यांच्या आगामी निवडणुकीच्या उमेदवारी वरच बोट ठेवत महाजन यांनी टीकास्त्र सोडले.

Comments
Add Comment

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील

NEET Results 2026 : NEET निकालावर पुन्हा संशय! अँसर कीनुसार ७००+ गुणांचा दावा, पण स्कोअरकार्डवर फक्त ८७; विद्यार्थिनीसह कुटुंबाचा आक्रोश

बीड : देशभरात NEET परीक्षेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी