Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूंची दमदाटी; शिवीगाळ करत, चाकू उगारत वारकऱ्यांचे तंबू उखडले!

साधूंवर कडक कारवाई करण्याची मागणी


नाशिक : नाशिकच्या (Nashik) त्र्यंबकेश्वरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेला (Sant Nivruttinath Maharaj Yatra) उद्यापासून सुरुवात होत आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी (Warkari) त्र्यंबक नगरीत दाखल झाले आहेत. सुमारे पाच लाख भाविक आणि ६०० हून अधिक दिंड्या त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, या वारकऱ्यांवर त्र्यंबकेश्वरमधील साधूंनी दमदाटी केली. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाईची मागणी वारकऱ्यांनी केली आहे.


त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांचे निवासस्थान ठरलेले असते. दरवर्षीप्रमाणे वारकऱ्यांनी आपापल्या जागेवर आपले तंबू बांधले होते. मात्र, या ठिकाणी काही साधूंनी अडवणूक केल्याचा आरोप वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. काही साधूंनी येऊन ही जागा आमची आहे, असे म्हणत दमदाटी करून वारकऱ्यांवर शिवीगाळ केला. तसेच हातात चाकू घेऊन साधूंनी वारकऱ्यांचे तंबू उखडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.


या साधूंवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वारकऱ्यांनी केली आहे, या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Comments
Add Comment

Nitesh Rane: आम्ही विरोधकांना दुर्बीण घेऊन शोधत...; नितेश राणेंचा विरोधकांवर हल्लाबोल

सिंधुदुर्ग: राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत सिमितीच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. याच निवडणुकीच्या

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर