Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना मिळणार सरकारी सुरक्षा

पोलीस कर्मचारी करणार तैनात


जालना : जालना (Jalna) येथील आंतरवाली सराटी येथून सुरु झालेला मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रवास आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आरक्षणासाठी उपोषण करमारे आणि ठिकाणठिकाणचे दौरे करुन मराठा बांधवांना एकत्रित करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा लढा येत्या काही दिवसांतच संपण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान, जरांगेंबाबत राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांना राज्य सरकारकडून (State Government) सुरक्षा (Security) पुरवण्यात येणार आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जरांगे यांच्या सुरक्षेसाठी २४ तास दोन सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत.


आंतरवाली सराटी गावात २९ ऑगस्ट रोजी सुरु झालेला जरांगेचा लढा पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे राज्यभर पोहोचला. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला. या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. यानंतर आता जरांगेंना सुरक्षा पुरवण्यात आली आहे.


Comments
Add Comment

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली