Union Budget 2024 : महिलांसाठी खूशखबर! ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार तर सूक्ष्म कर्जाची सुविधाही उपलब्ध करणार

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात (Union Budget 2024) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकरी’ हे सरकारचे प्राधान्य असल्याचे सूचित केले आहे. यातच महिलांसाठी विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. महत्वाची घोषणा म्हणजे आणखी ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.


लखपती दीदी या योजनेतून महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. केंद्र सरकारने हा महत्त्वाचा उपक्रम सुरू केला आहे. ज्यातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जातोय. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी महिलांना ज्ञान दिले जाते.


त्याचबरोबर या योजनेतून सूक्ष्म कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. ज्यातून महिला उद्योग शिक्षण किंवा इतर गरजा पूर्ण करू शकतात. तसेच जास्त स्त्रियांकडे गहाण ठेवण्यासाठी कोणतीही मौल्यवान वस्तू नाही. त्यांच्यासाठी ही कर्ज महत्त्वाची ठरतात. या योजनेअंतर्गत महिलांना तंत्रज्ञानाशी देखील जोडले जाते. कारण या योजनेत महिलांना डिजिटल बँकिंग सेवा, मोबाईल वॉलेट्स आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्म चा वापर करून आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापन सोयीस्करपणे करण्यास प्रोत्साहन दिले जाते.


आतापर्यंत २ कोटी महिला लखपती बनल्या असून, येणाऱ्या काळात आणखी ३ कोटी महिलांना लखपतीदीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या ८३ लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे.

Comments
Add Comment

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली

‘नरेगा’ अंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्त्यांना मोठा दिलासा

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील शेतमाल वाहतूक अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी ‘नरेगा’ अंतर्गत राबविण्यात