Union Budget 2024 : महिला आणि गरीबांना ‘अच्छे दिन’

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (१ फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था सरकारने केल्याचे सितारामन यांनी सांगितले. त्यानंतर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.


इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र १ कोटी करदात्यांचा होणार फायदा


केंद्र सरकारने यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax) कोणताच बदल केला नाही. मध्यमवर्गीयांसाठी कररचनेत काही बदल होऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आधी जो स्लॅब होता तोच कायम ठेवण्यात आला आहे. इन्कम टॅक्सबाबतची जुनी प्रकरणे मागे घेणार असल्याने १ कोटी करदात्यांचा मात्र फायदा होणार आहे.


देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार करणार


आगामी काळात देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार केले जातील. तसेच ४० हजार सामान्य डब्यांना वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर विकसित केले जाईल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि सुविधा देण्याचे उद्दीष्ट साध्य होईल.


३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार


महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.


१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी देखिल महिलांना ज्ञान दिले जाते.

Comments
Add Comment

Krishna Heritage Tower : भारतात उभे राहणार ४३० फुटांचे सर्वात उंच आध्यात्मिक स्थळ; लवकरच साकारणार 'हरे कृष्ण हेरिटेज टॉवर'

हैदराबाद : आपले गजबजलेले रस्ते, शतकानुशतके जुने वास्तूशिल्प आणि लज्जतदार खाद्यसंस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेले

Assam Emergency Landing Highway: पंतप्रधान मोदींच्या हस्ते देशातील पहिल्या विशेष 'इमर्जन्शी लँडिंग' सुविधेची सुरुवात

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Startup India FoF 2.0 : मोदी सरकारचा 'मास्टरस्ट्रोक'! स्टार्टअप्ससाठी १०,००० कोटींचा 'फंड ऑफ फंड्स २.०' मंजूर; टर्नओव्हरची मर्यादाही वाढवली

नवी दिल्ली : भारतीय स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी आणि स्वदेशी गुंतवणुकीला बळ देण्यासाठी केंद्र

Kumar Bhaskar Verma Bridge: आसाममधील ब्रह्मपुत्रेवरील ६ पदरी पुलाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

आसाम: यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आसाममध्ये राजकारण तापले आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीची जोरदार

Narendra Modi: पुलवामा हल्ल्याला ६ वर्षे पूर्ण; मोदींनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

मुंबई: पुलवामा हल्ल्याला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी x वर एक भावूक

Indian Passport : भारतीय पासपोर्टचे जागतिक महत्त्व वाढले, रँकिंग सुधारले

Henley Passport Index 2026 । नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट अर्थात भारतीय पारपत्राच्या जागतिक रँकिंगमध्ये (क्रमवारी) सुधारणा झाली