Union Budget 2024 : महिला आणि गरीबांना ‘अच्छे दिन’

  84

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी आज (१ फेब्रुवारी) मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला. हा अर्थसंकल्प अंतरिम असला तरी यात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन (Union Budget 2024) यांनी सलग सहाव्यांदा बजेट सादर केले. त्यांनी जवळपास एक तास भाषण केले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी सरकारी योजनांची माहिती दिली. मागील दहा वर्षांच्या काळात देशातील २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात सरकारला यश मिळाले. तसेच देशातील ८० कोटी लोकांना मोफत धान्य देण्याची व्यवस्था सरकारने केल्याचे सितारामन यांनी सांगितले. त्यानंतर अनेक महत्वाच्या घोषणा केल्या.


इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे, मात्र १ कोटी करदात्यांचा होणार फायदा


केंद्र सरकारने यंदा इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये (Income Tax) कोणताच बदल केला नाही. मध्यमवर्गीयांसाठी कररचनेत काही बदल होऊन दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र आधी जो स्लॅब होता तोच कायम ठेवण्यात आला आहे. इन्कम टॅक्सबाबतची जुनी प्रकरणे मागे घेणार असल्याने १ कोटी करदात्यांचा मात्र फायदा होणार आहे.


देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार करणार


आगामी काळात देशात आणखी तीन रेल्वे कॉरिडॉर ऊर्जा, खनिज आणि सिमेंट वाहतुकीसाठी तयार केले जातील. तसेच ४० हजार सामान्य डब्यांना वंदे भारत एक्सप्रेसच्या धर्तीवर विकसित केले जाईल. यामुळे प्रवासी सुरक्षा आणि सुविधा देण्याचे उद्दीष्ट साध्य होईल.


३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार


महिलांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. ही घोषणा म्हणजे ३ कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.


१५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लखपती योजनेचा उल्लेख केला होता. यामध्ये महिलांना आवश्यक आर्थिक ज्ञानासह सर्वसमावेशक आर्थिक साक्षरता कार्यशाळा देखील घेतल्या जातात. यामध्ये अर्थसंकल्प बचत गुंतवणूक आणि आर्थिक साधने याविषयी देखिल महिलांना ज्ञान दिले जाते.

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )