ज्ञानवापी प्रकरण : मशिदीच्या तळघरात पूजा करण्याचा हिंदूंना अधिकार

नवी दिल्ली : ज्ञानवापीच्या (Gyanvapi) व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार हिंदू (Hindu) पक्षाला असल्याचा निर्णय बुधवारी न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला १५ दिवसांत बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. हे तळघर मशिदीच्या खाली आहे.


आता येथे नियमित पूजा होणार आहे. काशी विश्वनाथ विश्वस्त मंडळातर्फे पूजा करण्यात येणार आहे. हिंदू पक्षाने हा मोठा विजय असल्याचे म्हटले असून ३० वर्षांनंतर न्याय मिळाल्याचा दावा केला आहे. नोव्हेंबर १९९३ पर्यंत येथे पूजा केली जात होती.


या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने दावा केला आहे की, नोव्हेंबर १९९३ पूर्वी तत्कालीन राज्य सरकारने व्यास तळघरातील पूजा थांबवली होती. ते पुन्हा सुरु करण्याचे अधिकार दिले पाहिजे अशी मागणी करण्यात आली होती.


दुसरीकडे, मुस्लिम बांधवांच्या बाजूने प्रार्थनास्थळ कायद्याचा हवाला देत याचिका फेटाळण्याची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने मुस्लिम बाजूची याचिका फेटाळून लावत हिंदूंच्या बाजूने ज्ञानवापीच्या व्यास तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे.


१७ जानेवारी रोजी व्यासजींचे तळघर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतले आहे. एएसआयच्या सर्वेक्षणाच्या कारवाईदरम्यान तळघर स्वच्छ करण्यात आले. आता ज्ञानवापी परिसरात असलेल्या व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचे काम काशी विश्वनाथ ट्रस्ट करणार आहे.

Comments
Add Comment

गडबड कराल तर पस्तावाल असा धडा शिकवू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

नवी दिल्ली : आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून

राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा झेंडा

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या कौशल्यधारित संकल्पनांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत

Gmail ID : २२ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली! आता बदलता येणार तुमचा 'रटाळ' Gmail ID; सुंदर पिचाईंनी दिली आनंदाची बातमी

कॅलिफोर्निया : जर तुम्ही १५-२० वर्षांपूर्वी एखादा ईमेल आयडी बनवला असेल आणि आज तो वापरताना तुम्हाला संकोच वाटत

दिल्लीत डोंगराची हवा विकणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: दिल्लीच्या विषारी हवेत श्वास घेणे कठीण होत असेल तर काय करावे? फक्त ५० रुपये द्या आणि हिमाचलच्या

Customs Duty on Petrochemical Products: सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, पेट्रोकेमिकल उत्पादनांवरील सीमा शुल्क रद्द; अनेक क्षेत्रांना होणार फायदा

नवी दिल्ली: मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे आणि त्यामुळे जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेल्या

Andhra Pradesh Capital : अमरावती बनणार आंध्र प्रदेशची राजधानी, लोकसभेत विधेयक मंजूर

आंध्र प्रदेशची राजधानी म्हणून अमरावतीला अधिकृत आणि कायमस्वरूपी मान्यता देणारे ‘आंध्र प्रदेश पुनर्गठन (संशोधन)