Arvind Kejriwal : ईडीकडून अरविंद केजरीवालांना पाचव्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारु घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते. पण समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


केजरीवाल यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत.


अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. सत्ताधारी भाजप चौकशीसाठी बोलावून अटक करणार असल्याचे आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. चौकशी करायची असेल तर प्रश्न लिहुन केजरीवालांकडे देऊ शकतात, असे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले की, प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे, परंतु हे समन्स देखील ईडीने पूर्वी पाठवलेल्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असून समन्स मागे घेण्याची मागणी केजरीवालांकडून करण्यात आली होती. तसेच मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगलो. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, दारु घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून आरोपी करण्याची तयारी आहे. मागील वर्षी आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी