Arvind Kejriwal : ईडीकडून अरविंद केजरीवालांना पाचव्यांदा समन्स

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना दारु घोटाळा प्रकरणी पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. ईडीने केजरीवाल यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावले आहे. याआधीही दारु घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना चौकशीसाठी बोलावले होते. पण समन्स बजावण्याची कारवाई सुडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.


केजरीवाल यांना १७ जानेवारी, ३ जानेवारी, २१ डिसेंबर आणि २ नोव्हेंबर रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र, अरविंद केजरीवाल ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत.


अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यासाठीच ही कारवाई केली जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाकडून केला जात आहे. सत्ताधारी भाजप चौकशीसाठी बोलावून अटक करणार असल्याचे आम आदमी पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले. चौकशी करायची असेल तर प्रश्न लिहुन केजरीवालांकडे देऊ शकतात, असे आपच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.


ईडीला पाठवलेल्या पत्रात केजरीवाल यांनी म्हटले की, प्रत्येक कायदेशीर समन्स स्वीकारण्यास तयार आहे, परंतु हे समन्स देखील ईडीने पूर्वी पाठवलेल्या समन्सप्रमाणेच बेकायदेशीर आहे. हे समन्स राजकीय हेतूने प्रेरित असून समन्स मागे घेण्याची मागणी केजरीवालांकडून करण्यात आली होती. तसेच मी माझे आयुष्य प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने जगलो. माझ्याकडे लपवण्यासारखे काही नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे.


दरम्यान, दारु घोटाळा प्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते मनिष सिसोदिया आणि संजय सिंह तुरुंगात आहेत. आता या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवून आरोपी करण्याची तयारी आहे. मागील वर्षी आप नेते विजय नायर यांनाही याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर