टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मांच्या अडचणीत वाढ

मुंबई: इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या अडचणीत सापडला आहे. आधीच विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची कमतरता भासत असलेल्या टीम इंडियाला आता दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरावे लागेल. चार मोठे मॅच विनर्स यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासाठी प्लेईंग ११ची निवड करणे सोपे असणार नाही.


टीम इंडियाने याआधी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे ते या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहेत. दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याने सुरूवातीच्या दोन सामन्यात तो टीम इंडियात खेळणार नाही. तर विराट कोहली खाजगी कारणामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नाही. या दिग्गज खेळाडूंच्या स्थानी दुसऱ्या कसोटीत दोन युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.



दिग्गज क्रिकेटपटूंची कमतरता भासणार?


टीम इंडियाच्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये केएल राहुलची कमतरता भासणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहुलने मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळली होती. आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर राहुलचा शानदार फॉर्म कायम ठेवला आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ८६ डावांची शानदार खेळी केली.


रवींद्र जडेजा बॉलसोबत बॅटिंगमध्येही कमाल करत आहे. भारतातकडून जडेजाने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. इतकंच नव्हे तर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दोन डावांत ५ विकेट मिळवले होते.


विराट कोहलीची कमतरताही टीम इंडियाला भासणार आहे. विराट कोहली मैदानात असताना प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो. याच कारणामुळे संघाला सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील