टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मांच्या अडचणीत वाढ

मुंबई: इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या अडचणीत सापडला आहे. आधीच विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची कमतरता भासत असलेल्या टीम इंडियाला आता दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरावे लागेल. चार मोठे मॅच विनर्स यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासाठी प्लेईंग ११ची निवड करणे सोपे असणार नाही.


टीम इंडियाने याआधी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे ते या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहेत. दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याने सुरूवातीच्या दोन सामन्यात तो टीम इंडियात खेळणार नाही. तर विराट कोहली खाजगी कारणामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नाही. या दिग्गज खेळाडूंच्या स्थानी दुसऱ्या कसोटीत दोन युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.



दिग्गज क्रिकेटपटूंची कमतरता भासणार?


टीम इंडियाच्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये केएल राहुलची कमतरता भासणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहुलने मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळली होती. आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर राहुलचा शानदार फॉर्म कायम ठेवला आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ८६ डावांची शानदार खेळी केली.


रवींद्र जडेजा बॉलसोबत बॅटिंगमध्येही कमाल करत आहे. भारतातकडून जडेजाने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. इतकंच नव्हे तर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दोन डावांत ५ विकेट मिळवले होते.


विराट कोहलीची कमतरताही टीम इंडियाला भासणार आहे. विराट कोहली मैदानात असताना प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो. याच कारणामुळे संघाला सपोर्ट मिळतो.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.