टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मांच्या अडचणीत वाढ

Share

मुंबई: इंग्लंडविरुद्ध २ फेब्रुवारीपासून सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा मोठ्या अडचणीत सापडला आहे. आधीच विराट कोहली आणि मोहम्मद शमी यांची कमतरता भासत असलेल्या टीम इंडियाला आता दुसऱ्या कसोटीत रवींद्र जडेजा आणि केएल राहुलशिवाय मैदानात उतरावे लागेल. चार मोठे मॅच विनर्स यांच्या अनुपस्थितीत रोहित शर्मासाठी प्लेईंग ११ची निवड करणे सोपे असणार नाही.

टीम इंडियाने याआधी पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावला आहे. त्यामुळे ते या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर आहेत. दुखापतग्रस्त झाल्याने केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा भाग असणार नाहीत. मोहम्मद शमीही दुखापतग्रस्त झाल्याने सुरूवातीच्या दोन सामन्यात तो टीम इंडियात खेळणार नाही. तर विराट कोहली खाजगी कारणामुळे मालिकेतील पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नाही. या दिग्गज खेळाडूंच्या स्थानी दुसऱ्या कसोटीत दोन युवा खेळाडूंना पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.

दिग्गज क्रिकेटपटूंची कमतरता भासणार?

टीम इंडियाच्याला बॅटिंग ऑर्डरमध्ये केएल राहुलची कमतरता भासणार आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत राहुलने मधल्या फळीतील जबाबदारी सांभाळली होती. आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकल्यानंतर राहुलचा शानदार फॉर्म कायम ठेवला आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ८६ डावांची शानदार खेळी केली.

रवींद्र जडेजा बॉलसोबत बॅटिंगमध्येही कमाल करत आहे. भारतातकडून जडेजाने सर्वाधिक ८७ धावांची खेळी केली होती. इतकंच नव्हे तर रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीच्या दोन डावांत ५ विकेट मिळवले होते.

विराट कोहलीची कमतरताही टीम इंडियाला भासणार आहे. विराट कोहली मैदानात असताना प्रेक्षकांमध्ये उत्साह असतो. याच कारणामुळे संघाला सपोर्ट मिळतो.

Recent Posts

Delta Plane Catches Fire : ऑर्लँडो विमानतळावर डेल्टा विमानाला आग, २८२ प्रवासी थोडक्यात बचावले

ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…

12 minutes ago

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

1 hour ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

1 hour ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

2 hours ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

3 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

3 hours ago