चंदीगढ महापौर निवडणूक : भाजपचा विजय, असा बिघडला काँग्रेस-आपचा गेम

नवी दिल्ली: चंदीगढच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आहे. भाजप संख्याबळाच्या दृष्टीने काँग्रेस आणि आम आदमी पक्ष मागे होता. १६ मतांसह मनोज सोनकर ही निवडणूक जिंकत चंदीगढ शहरातील पुढील महापौर म्हणून निवडून आलेत.


चंदीगढ महापालिकेत भाजपचे १४ नगरसेवक आहेत. संख्याबळाच्या दृष्टीने भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. भाजपनंतर १३ नगरसेवकंसह आम आदमी पक्ष चंदीगढ महापालिकेतील दुसरा सगळ्यात मोठा पक्ष आहे. काँग्रेसचे ७ नगरसेवक आहेत आणि एक नगरसेवक शिरोमणी अकाली दलचे आहेत.


चंदीगढ महापौर निवडणुकीत स्थानिक खासदारांनाही मतदानाचा अधिकार आहे. चंदीगढमध्ये भाजपच्या किरण खेर खासदार आहे. किरण खेर यांना पकडले तर भाजपची संख्या १५ होते. तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची मिळून संख्याबळ २० नगरसेवक आहेत.


चंदीगढ महापालिकेत एकूण ३५ नगरसेवक आहेत आणि एक खासदाराचे मत असते. एकूण ३६ मते असलेल्या महापौर निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी १९ मते मिळणे गरजेचे होते. भाजपकडे त्यांचे नगरसेवक, खासदार मिळून एकूण मते १५ होत होी. शिरोमणी अकाली दलाचे एक मत जोडले असता ही संख्या १६पर्यंत पोहोचत हती. दुसरीकडे आम आदमी पक्षाचे १३ आणि काँग्रेसचे सात मिळून हा आकडा २० पर्यंत पोहोचत होता. दोन्ही पक्षांनी एकत्र मिळून उमेदवार उतरवल्यानंतर या निवडणुकीतील विजय त्यांच्यासाठी सुनिश्चित मानला जात होता. मात्र जेव्हा निकाल हाती आला तेव्हा भाजपने विजयी पताका फडकावली होती.


महापौर निवडणूकीसाठी सर्व ३५ नगरसेवक आणि खासदार किरण खेर यांनी मतदान केले. मतदानानंतर मतमोजणी सुरू झाली. भाजप उमेदवाराला १६ मते पडली होती. शिरोमणी अकाली दलाचे एकमेव मत जोडून मतांचा आकडा १६वर पोहोचला होता. तर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवाराल २० मते मिळाली होती.


आता असे झाले की काँग्रेस-आप उमेदवाराच्या पक्षात मिळालेल्या २० मतांपैकी ८ मते रिजेक्ट झाली. आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची मते १३ अधिक सात म्हणजेच २०. मात्र त्यातील ८ मते रिजेक्ट झाल्याने त्यांच्याकडे १२ मतेच राहिले. यामुळे भाजपला विजय मिळाला तर आप आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला.

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर