NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीबाबत नार्वेकरांना मिळाली मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत निर्णय येणे अपेक्षित

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रतेचा निकाल सोपवण्यात आला होता. यातील शिवसेनेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर ठाकरे गट किंवा शिवसेना कोणाचेही आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत. यानंतर आता सर्वांना राष्ट्रवादीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. हा निकाल देखील शिवसेनेप्रमाणे अजित पवारांच्या बाजूने लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता यात मुदतवाढ करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत.


सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी नार्वेकरांना केवळ एक आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला केली.


नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टाला अशी हमी दिली की ३१ जानेवारीला ही सुनावणी पूर्णपणे बंद होईल आणि निकाल राखून ठेवला जाईल. फक्त त्यांना हा निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ हवा आहे. पण यामध्ये अॅड. सिंघवींनी त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने समतोल साधत त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानुसार आता जो निकाल ३१ जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित होत तो आता लांबणवीर पडून १५ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा