NCP MLA Disqualification : राष्ट्रवादीबाबत नार्वेकरांना मिळाली मुदतवाढ; आता 'या' तारखेपर्यंत निर्णय येणे अपेक्षित

नवी दिल्ली : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यावर शिवसेना (Shivsena) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार अपात्रतेचा निकाल सोपवण्यात आला होता. यातील शिवसेनेचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर ठाकरे गट किंवा शिवसेना कोणाचेही आमदार अपात्र ठरवण्यात आले नाहीत. यानंतर आता सर्वांना राष्ट्रवादीच्या निकालाची उत्सुकता लागली आहे. हा निकाल देखील शिवसेनेप्रमाणे अजित पवारांच्या बाजूने लागण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. यासाठी सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना ३१ जानेवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, आता यात मुदतवाढ करण्यात आली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत नार्वेकरांनी निर्णय घ्यावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं त्यांना दिले आहेत.


सुप्रीम कोर्टात आज सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर यांनी तीन आठवड्यांचा वेळ मागितला. यावर शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी नार्वेकरांना केवळ एक आठवड्यांचा वेळ वाढवून द्यावा अशी विनंती कोर्टाला केली.


नार्वेकरांचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टाला अशी हमी दिली की ३१ जानेवारीला ही सुनावणी पूर्णपणे बंद होईल आणि निकाल राखून ठेवला जाईल. फक्त त्यांना हा निकाल लिहिण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ हवा आहे. पण यामध्ये अॅड. सिंघवींनी त्यांना एक आठवड्याचाच वेळ देण्याची मागणी केली. सुप्रीम कोर्टाने समतोल साधत त्यांना १५ दिवसांचा वेळ दिला. त्यानुसार आता जो निकाल ३१ जानेवारीपर्यंत येणं अपेक्षित होत तो आता लांबणवीर पडून १५ फेब्रुवारीला देण्यात येणार आहे.


Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय