मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, हैदराबादमध्ये पराभवानंतर टीम इंडियाला डबल झटका बसला आहे. विशाखापट्टणम येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.
भारत आणि इंग्लंड यांच्यात २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाले आहे. जडेजाला हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तर केएल राहुलच्या उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखत होते. दरम्यान, बीसीसीआयच्या मेडिकल टीम दोन्ही खेळाडूंवर नजर ठेवून आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. तर आवेश खान आपल्या रणजी टीम मध्य प्रदेशसोबत राहणार आहे.
इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया – रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत(विकेटकीपर), ध्रुव जरेल(विकेटकीपर), रवींचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…