IND vs ENG: दुसऱ्या कसोटीआधी टीम इंडियाला डबल झटका

मुंबई: भारतीय क्रिकेट संघासाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर, हैदराबादमध्ये पराभवानंतर टीम इंडियाला डबल झटका बसला आहे. विशाखापट्टणम येथे खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून स्टार ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाला आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली.


भारत आणि इंग्लंड यांच्यात २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणम येथे पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाणार आहे. या कसोटी सामन्यात ऑलराऊंडर रवींद्र जडेजा आणि मधल्या फळीतील फलंदाज केएल राहुल बाहेर झाले आहे. जडेजाला हैदराबादमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी हॅमस्ट्रिंग दुखापत झाली होती. तर केएल राहुलच्या उजव्या क्वाड्रिसेप्समध्ये दुखत होते. दरम्यान, बीसीसीआयच्या मेडिकल टीम दोन्ही खेळाडूंवर नजर ठेवून आहे.


 


भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीने सरफराज खान, सौरभ कुमार आणि वॉशिंग्टन सुंदरला दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात सामील करण्यात आले आहे. तर आवेश खान आपल्या रणजी टीम मध्य प्रदेशसोबत राहणार आहे.


इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा(कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, श्रेयस अय्यर, केएस भरत(विकेटकीपर), ध्रुव जरेल(विकेटकीपर), रवींचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह(उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार.

Comments
Add Comment

युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.