जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या लढयाला अखेर काल यश आले. राज्य सरकारने मराठा समाजाच्या (Maratha Samaj) सर्व मागण्या मान्य केल्या. त्यामुळे उपोषणकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडले. संपूर्ण मराठा समाजात यानंतर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण आहे. ठिकठिकणी पेढे वाटून, गुलाल उधळून हा जल्लोष साजरा केला जात आहे.
हे आरक्षण मिळेपर्यंत घराच्या उंबर्यावर पायदेखील ठेवायचा नाही, असा निश्चय मनोज जरांगे केला होता. यामुळे ते घरी कधी येणार याची सर्वजण वाट पाहत असतानाच मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे गोदा पट्ट्यातील आंदोलकांची बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२ वाजता ही बैठक होणार आहे.
मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यावर सर्व मराठ्यांची एक विजयी सभा आयोजित करण्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. विजयी सभा कुठे आयोजित करायची, कधी करायची यावर चर्चा होणार आहे. या बैठकीत गोदा पट्ट्यातील प्रमुख मराठा आंदोलक उपस्थित राहणार आहेत. सर्वांच्या चर्चेनंतर यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…
मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…
इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…