Police Academy: चार राज्यातील आदिवासी युवा युवतींची महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला भेट

नाशिक प्रतिनिधी: नेहरू युवा केंद्र नाशिक अंतर्गत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठ येथे झारखंड, उडीसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातून आलेल्या 200 आदिवासी युवक युवतींचे प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असुन आज त्यांनी महाराष्ट्र पोलीस अकॅडमीला भेट दिली. प्रसंगी त्यांनी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या स्थापनेपासून आजवरचा प्रवास याची माहिती जाणून घेत. म्युझियमला भेट देऊन म्युझियम मधील विविध स्थित्यंतरानुसार बदलणाऱ्या बंदूक, रायफल, वर्दी, पोस्टिंग नुसार बदलणारे स्टार्स, ड्रेस कोड यांची माहिती जाणून घेतली.


तसेच आजवर नाशिक पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांची माहिती जाणून घेतली. प्रसंगी त्यांचे सात वेगवेगळे गट तयार करण्यात आले होते. त्यांना वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी पोलीस प्रशिक्षण कार्यक्रम व आजवरच्या प्रवासाची माहिती दिली. सदर अभ्यास भेट महाराष्ट्र पोलीस अकॅडमीचे संचालक, उपसंचालक तसेच नेहरू युवा केंद्र राज्य निदेशक प्रकाश मनोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी पोलीस निरीक्षक एस बावस्कर, जिल्हा युवा अधिकारी कमल त्रिपाठी, राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते मोहम्मद अरिफ खान उपस्थित होते सदर कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी नितीन रायते, महेश बोरसे, राजेंद्र महाले, विशाल थोरात, किरण चव्हाण, समाधान भामरे आदींनी परिश्रम घेतले.

Comments
Add Comment

किया इंडियाने कारची वॉरंटी ७ वर्षांपर्यंत वाढवली

मुंबई:किया इंडिया मास प्रीमियम कारमेकरने आपला एक्‍स्‍टेण्‍डेड वॉरंटी प्रोग्राम वेईकल डिलिव्‍हरीच्‍या

मराठा सेवा संघाच्या नकुल भोईरची हत्या, पत्नीला अटक

पुणे: पुणे जिल्ह्यातील चिंचवड परिसरात मध्यरात्री घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. मराठा सेवा संघ आणि

८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठुभक्ताची पंढरपूर वारी

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ बेळगाव : पौराणिक कथेप्रमाणे कर्नाटकातही आधुनिक श्रावणबाळ असल्याचं दिसून आलं आहे.

पुणेकरांसाठी पुन्हा त्रासदायक बातमी; भिडे पूल पुन्हा बंद, नववर्षातच खुला होण्याची शक्यता

पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासातील एक महत्त्वाचा दुवा असलेला बाबाराव भिडे पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद

पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वेवर दि. २५ ते २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर

सोन्याचा हार कचऱ्यात गेला; कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधाशोध झाली आणि अखेर...

कल्याण : सोन्याचे दर दिवसेंदिवस वाढत असून सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. अशा काळात सोनं जपून ठेवणं