Mumbai: नाराज प्रियकराने केली हत्या, पोलिसांना फोनमध्ये मिळाले लेटर

मुंबई: मुंबईमध्ये गेल्या ३४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १९ वर्षीय महिलेची नवी मुंबईच्या कळंबोली भागात हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणी पोलिसांनी खुलासा करत सांगितले की महिलेची हत्या तिच्या प्रियकराने केली होती. हा प्रियकर तिच्यावर नाराज होता.


पोलिसांनी बुधवारी या प्रकरणाच्या सुरूवातीच्या तपासामध्ये आढळले की महिलेच्या प्रियकराने ही हत्या केली. या प्रियकराने रेल्वेच्या समोर उडी घेत आत्महत्या केली होती. आरोपीने खारघरच्या जंगलात महिलेची गळा घोटून हत्या केली होती.



१२ डिसेंबरला बेपत्ता झाली होती महिला


एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिलाशी संबंध तोडण्यावरून नाराज होता आणि याच कारणामुळे गळा दाबून महिलेची हत्या केली. महिला १२ डिसेंबरला सायनमध्ये कॉलेजसाठी निघाली होती. यानंतर ती घरातच परतली नाही. तिच्या घरी न परतण्यावरून पोलीस स्टेशनमध्ये ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती.



कोड वर्ड डिकोड करत केला खुलासा


अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांना बुरूंगलेने मोबाईल फोनमध्ये सेव्ह करण्यात आलेली एक सुसाईड नोट आढळली. यात लिहिले होते की त्याने या महिलेची हत्या करत आत्महत्या करायला जात आहे. सुसाईट नोटमध्ये L01-501 यासारख्या कोड वर्डचा वापर करण्यात आला होता. पोलिसांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी डिकोड केले होते.

Comments
Add Comment

Monsoon Update : देशात पावसाची 64 टक्के तूट; महाराष्ट्रासह 16 राज्यांत पावसाची प्रतीक्षा

मुंबई : भारतात नैऋत्य मोसमी पावसाचा वेग मंदावला आहे. सोमवार, 15 जून रोजीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये देशाच्या मोठ्या

Census : राज्यातील जनगणनेचा पहिला टप्पा यशस्वी

मुंबई : जनगणना 2027 साठी महाराष्ट्रात गृहसूची आणि गृह गणनेचा पहिला टप्पा यशस्वी पूर्ण; राज्यभरात 16 मे ते 14 जून 2026 या

Pre-Monsoon Preparations : ठाणे जिल्ह्यातील रस्ते कामांना गती देण्याचे निर्देश

सर्व मनपानी आपापल्या क्षेत्रातील क्लस्टर पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे एमएसईबीची प्रलंबित कामे तत्काळ

Eknath Shinde : मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतला आढावा

मुंबई परिसरात ‘शून्य जीवितहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Mumbai Metropolitan Region : आता एकाच तिकिटावर करा संपूर्ण 'एमएमआर'मध्ये बस प्रवास!

राज्य सरकारकडून अभ्यास गट स्थापन; मार्गांचे सुसूत्रीकरण आणि ‘टेलिस्कोपिक भाडे’ रचनेवर होणार काम मुंबई : मुंबई

Smart Meter : स्मार्ट मीटरवर मोठा निर्णय येणार? जयंत पाटील-फडणवीस भेट चर्चेत

मुंबई : राज्यात जुन्या मीटरच्या जागी बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य घरगुती ग्राहक आणि