नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे. यामुळे नवी मुंबईत वाहनांना बंदी; २६ जानेवारी रोजी रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange) पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. यासाठी २५ जानेवारीला रात्री १२ ते २६ जानेवारीला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसेच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाला असून आज तो लोणावळ्याकडे कूच करत आहे.
गुरुवार २५ जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…
मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…
मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…
हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…
मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात (Maharashtra Monsoon Sessions) आज एक महत्त्वाचा ठराव मांडला जाण्याची…