Maratha Reservation : नवी मुंबईत अवजड वाहनांना बंदी!

नवी मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने येत आहे. यामुळे नवी मुंबईत वाहनांना बंदी; २६ जानेवारी रोजी रात्री ११ पर्यंत अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे.


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंची (Manoj Jarange) पदयात्रा २५ जानेवारी रोजी नवी मुंबई (Navi Mumbai) पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत दाखल होणार आहे. यासाठी २५ जानेवारीला रात्री १२ ते २६ जानेवारीला रात्री ११ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय वाहनं उभी करण्यास तसेच शहरातील सर्व मार्गावरुन मार्गस्थ होण्यास बंदी आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी याबाबत अधिसूचना जारी केली आहे.



मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण यात्रेचा आज पाचवा दिवस आहे. जरांगेचा आज लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगेंनी केला आहे. आरक्षणासाठी गोळ्या झेलायलाही तयार आहे असा थेट इशारा मनोज जरांगेंनी सरकारला दिला आहे. या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले आहेत. जालनाच्या अंतरवाली सराटीतून निघालेला मोर्चा बीडवरुन, अहमदनगरमार्गे पुण्यात दाखल झाला असून आज तो लोणावळ्याकडे कूच करत आहे.


गुरुवार २५ जानेवारी रोजी हा मोर्चा नवी मुंबईत धडकणार आहे. त्यावेळी मराठा आंदोलकांच्या मुक्कामाची सोय ही नवी मुंबईत करण्यात आली आहे. नवी मुंबईतली मैदानं, सामाजिक सभागृहं, शाळा, एपीएमसी मार्केट या ठिकाणी मराठा आंदोलकांच्या निवासाची, जेवणाची आणि त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

Comments
Add Comment

२८ गावांतील आकारी पड जमीन शेतकऱ्यांना परत!

आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नांना यश कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोरे विभागातील २८ गावांमधील हजारो

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसाठी ६८ कोटींचा खर्च

विरार : वसई - विरार पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवर सध्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांच्या

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

कबुतरखान्यांसाठी महापालिकेकडून पर्यायी जागांचा शोध

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांसाठी जनतेला तथा नागरिकांना त्रास होणार नाही, अशा पर्यायी जागांचा शोध घेऊन मुंबई

बेस्टच्या १५७ नव्या वातानुकूलित बसगाड्यांचे लोकार्पण

बेस्टला सक्षम करण्याचे राज्य सरकारचे ध्येय मुंबई : 'जोपर्यंत बेस्ट उपक्रम ४० टक्क्यांपर्यंत बस

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय