Loksabha Election Date : लोकसभा निवडणुका १६ एप्रिलला? व्हायरल पत्र खरं की खोटं?

मुंबई : सध्या सर्वच राजकीय पक्षांनी (Political parties) लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) कंबर कसली आहे. याचवर्षी या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तारखांबाबत मात्र घोळ आहे. सोशल मीडियावर (Social Media) लोकसभा निवडणूक १६ एप्रिलला घेतली जाणार असल्याचं निवडणूक आयोगाचं (Election commission) एक पत्र व्हायरल होत आहे. मात्र, दुसरीकडे निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळलं आहे.


निवडणूक आयोगाच्या तयारीसाठी ही तात्पुरती तारीख आहे. निवडणुकीची सुरुवातीची तारीख आणि अंतिम तारीख यांचा आराखडा ठरवण्यासाठी १६ एप्रिल ही तारीख ठरवण्यात आल्याचं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. निवडणूक १६ एप्रिलला होणार याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या सीईओनी ही पोस्ट केली आहे. पत्रात देण्यात आलेली तारीख संदर्भासाठी आहे बाकी काहीही नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.


दिल्लीच्या सीईओ कार्यालयातर्फे करण्यात आलेल्या पोस्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, ‘२०२४ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख १६ एप्रिल आहे. मात्र हे स्पष्टपणे सांगण्यात येत आहे की, जाहीर करण्यात आलेली तारीख ही निवडणूक आयोगाला आराखडा आणि योजनेच्या तयारीसाठी संदर्भ म्हणून जाहीर करण्यात आली होती. आत्तापर्यंत निवडणुकीचा आराखडा नक्की झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


Comments
Add Comment

महाराष्ट्रात एप्रिलपासून मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन

निवडणूक आयोगाचे २२ राज्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना लेखी निर्देश नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगाने

महाराष्ट्रातील स्टार्टअपच्या कामगिरीची मंत्री नितेश राणे यांच्याकडून प्रशंसा

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती, जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा नवी

इंडिया AI इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये 'कुंभदूत' एजेंटिक AI संकल्पनेचे सादरीकरण

सिंहस्थ २०२७ पूर्वी टप्प्याटप्प्याने तंत्रज्ञानाचा उपयोग नवी दिल्ली / नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आता गुपचूप लग्न शक्य नाही? गुजरातमध्ये विवाह नोंदणीसाठी नवा प्रस्ताव

अहमदाबाद : गुजरातमध्ये विवाहाच्या नोंदणीत काही बदल करण्यात आले आहेत. सध्याच्या नियमांनुसार, विवाहाची नोंदणी

VIRAL VIDEO : सावधान! देवभूमीचा ट्रिप प्लॅन करताय? हा थरारक व्हिडिओ पाहून तुमचेही पाय लटपटतील!

देहराडून : उत्तराखंडमधील प्रसिद्ध सिद्धपीठ माता धारी देवी मंदिराजवळ नदीपात्रात दोन बोटींची समोरासमोर भीषण धडक

India AI Impact Summit 2026 : एआय समिटमध्ये महाराष्ट्राचा डंका! कृषी विकासासाठी 'महाॲग्री एआय' ठरणार गेमचेंजर - मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली : कृषी क्षेत्रात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या सहाय्याने अन्न सुरक्षितता, वातावरणातील बदलाला सामोरे