Eknath Shinde : लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही!

बाळासाहेबांचा पोशाख करणार्‍या उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जोरदार टीका


मुंबई : अयोध्येत (Ayodhya) २२ जानेवारी रोजी भव्य असा रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratishtha) सोहळा पार पडला. ठाकरे गटाचे (Thackeray Group) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आले होते, मात्र ते अयोध्येला गेले नाहीत. त्यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात (Nashik Kalaram Mandir) जाऊन पूजा केली. तसेच गोदावरीची महाआरती केली. यानंतर त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर टीका केली. शिवाय नाशिकमधील या पूजेसाठी त्यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसारखा (Balasaheb Thackeray) पोशाख केला होता. भगव्या रंगाचा कुर्ता, पांढरा पायजमा आणि गळ्यात माळा घातल्या होत्या.या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंविरोधात टीकास्त्र उपसले. 'लबाड लांडग्याने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो काय वाघ होत नाही', अशी सणसणीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बाळासाहेबांसारखे भगवे कपडे आणि रुद्राक्षांच्या माळा घातल्या म्हणजे कुणाला बाळासाहेब होता येणार नाही. त्यासाठी बाळासाहेबांसारखे प्रखर विचार असावे लागतात. लबाड लांडग्यांने वाघाचे कातडे पांघरले म्हणजे तो वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचे काळीज लागते. वाघ एकच आणि तो म्हणजे बाळासाहेब ठाकरे".


उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आमची घराणेशाही आहे. पण ती वडिलोपार्जित घराणेशाही आहे. आम्ही ३० वर्षांत भाजपवाले झालो नाहीत, मग काँग्रेसवासी कसे होऊ असा सवाल ठाकरेंनी विचारला होता. त्यावर, चोख प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काँग्रेसच्या ताटाखालील मांजर होऊन सत्तेसाठी, मुख्यमंत्री पदासाठी मिंधेपणा करणारे सर्वात मोठे मिंधे कोण..? ये पब्लिक है... सब जानती है!, अशी चपराक मुख्यमंत्र्यांनी लगावली.

Comments
Add Comment

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी