Earthquake: सलग तिसऱ्या दिवशी भारतात बसले भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली: भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसले. देशात तीन विविध राज्यांत आलेल्या भूकंपामुळे धरती हलली. सगळ्यात आधी कर्नाटक, नंतर छत्तीसगड आणि अखेरीस उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान, या भूकंपादरम्यान कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही आहे. शेजारील देश पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार आज दुपारी २.१३ वाजता कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये हलके भूकंपाचे धक्के जाणवले याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. तर छत्तीसगडच्या जांजगीर चांपामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ३.४० वाजता आलेल्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी होती. १६ मिनिटांनी ३.५६ मिनिटांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप आला. याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी होती.



पाकिस्तान-म्यानमारमध्ये किती तीव्रतेचा भूकंप?


पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार पाकिस्तानात संध्याकाळी ४.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारमध्ये सकाळी ८.५२ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.



तिसऱ्या दिवशी तिसरा भूकंप


भारतात याआधी सोमवारी रात्री उशिरा साधारण १२.४५ वाजता भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू चीनमध्ये होते. दिल्ली-एनसीआरसहित उत्तर भारतात भूकंपाचे वेगवान झटके बसले. दरम्यान, यात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Comments
Add Comment

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही