Earthquake: सलग तिसऱ्या दिवशी भारतात बसले भूकंपाचे धक्के

  88

नवी दिल्ली: भारतात आज सलग तिसऱ्या दिवशी भूकंपाचे धक्के बसले. देशात तीन विविध राज्यांत आलेल्या भूकंपामुळे धरती हलली. सगळ्यात आधी कर्नाटक, नंतर छत्तीसगड आणि अखेरीस उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंपाचे धक्के बसले. दरम्यान, या भूकंपादरम्यान कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही आहे. शेजारील देश पाकिस्तान आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.


नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार आज दुपारी २.१३ वाजता कर्नाटकच्या बेल्लारीमध्ये हलके भूकंपाचे धक्के जाणवले याची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. तर छत्तीसगडच्या जांजगीर चांपामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ३.४० वाजता आलेल्या भूकंपाची तीव्रता २.९ रिश्टर स्केल इतकी होती. १६ मिनिटांनी ३.५६ मिनिटांनी उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये भूकंप आला. याची तीव्रता २.४ रिश्टर स्केल इतकी होती.



पाकिस्तान-म्यानमारमध्ये किती तीव्रतेचा भूकंप?


पाकिस्तानातही भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचे होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार अद्याप कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सीस्मॉलॉजीनुसार पाकिस्तानात संध्याकाळी ४.१६ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. म्यानमारमध्ये सकाळी ८.५२ मिनिटांनी ३.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले.



तिसऱ्या दिवशी तिसरा भूकंप


भारतात याआधी सोमवारी रात्री उशिरा साधारण १२.४५ वाजता भूकंप आला होता. या भूकंपाचे केंद्रबिंदू चीनमध्ये होते. दिल्ली-एनसीआरसहित उत्तर भारतात भूकंपाचे वेगवान झटके बसले. दरम्यान, यात कोणतीही जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

Comments
Add Comment

Devendra Fadanvis : "ओबीसीसाठी लढलो म्हणून टार्गेट झालो, पण लढा थांबणार नाही!" देवेंद्र फडणवीसांचा ठाम निर्धार

गोवा : गोव्यात सुरू असलेल्या ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

Gujrat : गुजरातमध्ये सिंहाला छळणाऱ्या व्यक्तीला अटक; व्हायरल व्हिडिओमुळे वन विभागाची कारवाई

गुजरात : गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील टल्ली गावात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारात, ३२ वर्षीय शेतकऱ्याने

Jammu And Kashmir : उधमपूरमध्ये शोकांतिका; CRPFचे वाहन खोल दरीत कोसळले, दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात बसंतगड परिसरात एक मोठा अपघात घडला आहे. केंद्रीय राखीव पोलिस

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयामुळे न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

PM Modi : ट्रम्पच्या धमक्यांना मोदींचं एका वाक्यात उत्तर : "शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार"

अमेरिकेच्या ५०% टॅरिफवर मोदींचा ठाम पवित्रा नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याचा

११९ देशांमधील ५६० कोटी लोकांना चिकनगुनियाचा धोका

२० वर्षांपूर्वी जगभरात केला होता कहर नवी दिल्ली : सुमारे २० वर्षांपूर्वी जगभरात कहर करणारा हा विषाणू पुन्हा