जमिनीनंतर आता आकाशातून रस्ते बनवणार गडकरी, खर्च १.२५ लाख कोटी, जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट सुरू

नवी दिल्ली: रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी(nitin gadkari) यांचे आता पुढील लक्ष्य आभाळाकडे आहे. जमिनीवर रस्ते आणि एक्सप्रेवेचे जाळे विस्तारल्यानंतर आता त्यांचे पुढील ध्येय आकाशातून रस्ते निर्माण करण्यातवर आहे. अशा दुर्गम ठिकाणी जिथे रस्ते बांधणे कठीण असते आणि पायी जाणे अतिशय आव्हानात्मक आहे तेथे गडकरी यांनी हवाई मार्गाने जाणारा मार्ग शोधला आहे. यासाठी त्यांनी पुढील ५ वर्षांचा प्लान तयार केला आहे. यावर सव्वा लाख कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.


गडकरी यांनी नॅशनल रोपवे डेव्हलपमेंट प्रोग्राम जे पर्वतरांगा परियोजनेचा भाग आहे याअंतर्गत देशभरात २०० रोपवे प्रोजेक्ट बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. पुढील ५ वर्षात या प्रोजेक्टवर काम केले जाणार आहे. या प्रोजेक्टवर साधारण १.२५ लाख कोटी रूपये खर्च येण्याचे अनुमान आहे. गडकरी पुढे म्हणाले, यासाठीच्या पैशांची व्यवस्था सरकारसोहत खाजगी कंपन्यांकडूनही केली जाणार आहे. ही योजना पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.



शहरांसाठीही बनवले जाणार रोपवे


गडकरी यांचे म्हणणे आहे की रोपवे व्यवस्था केवळ डोंगराळ भागात पर्यटन व्यवस्था वाढवण्यास फायदेशीर ठरणार नाही. तर शहरी भागांतही हे दळणवळणाचे चांगले साधन बनू शकते. मला विश्वास आहे की रोपवे निर्मिती देशात पर्यटन वाढवण्यासोबतच नोकरी निर्मिती तसेच ट्रॅफिक सोपे बनवण्याचे मुख्य कारण बनू शकतात.



जगातील सर्वात मोठा प्रोजेक्ट


गडकरींनी सांगितले भारतात साधारण १२०० किमीचा रोपवे प्रोजेक्ट तयार केला जाईल. हा जगातील सर्वात मोठा रोपवे प्रोजेक्ट आहे. खरंतर, देशातील ३० टक्के भाग डोंगर आणि जंगलाने भरलेला आहे. येथे रस्ते आणि रेल्वे मार्ग विकसित करणेzdc आव्हानात्मक आहे. याचा पर्याय रोपवेच्या माध्यमातून पूर्ण केला जाऊ शकतो.

Comments
Add Comment

Eknath shinde delhi amit shah : दिल्लीत शिंदे, मुंबईत 'खलबतं'! नाराज एकनाथ शिंदे अमित शहांच्या भेटीला; तिकडे CM फडणवीस आणि अजित पवारांची तातडीची गुप्त बैठक

मुंबई : राज्यात सत्ताधारी महायुतीत (Mahayuti) सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. स्थानिक स्वराज्य

पीएम किसान हप्ता अडकला? जाणून घ्या कारण आणि उपाय

मुंबई : देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

Vande Bharat Sleeper : 'स्लीपर वंदे भारत' पुढच्या महिन्यात धावणार! रेल्वे मंत्र्यांचे बुलेट ट्रेनवरही निर्णायक वक्तव्य

नवी दिल्ली : देशातील रेल्वे प्रवासाला आधुनिक गती देणारी महत्त्वपूर्ण माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Ashvini

बिहार विधानसभेत एनडीएच्या मंत्र्यांची आकडेवारी निश्चित, मात्र अध्यक्षपदासाठी पेच

पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता एनडीएकडून सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला

आसाममध्ये चाललंय तरी काय? बोगस डॉक्टरने केले २५ वर्षांपासून हजारो रुग्णांवर उपचार!

आसाम: आसाममध्ये बोगस डॉक्टर गेल्या अडीज वर्षांपासून रुग्णांवर उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

राष्ट्रपतींच्या हस्ते सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार, नवी मुंबई मनपासह नाशिकच्या कानिफनाथ जलवापर संस्थेचाही