Shoaib Malik: सानिया मिर्झासोबतच्या घटस्फोटानंतर शोएब मलिकसमोर नवी अडचण, मॅच फिक्सिंवरून होऊ शकतो तपास

मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिक सातत्याने चर्चेत आहे. नुकताच शोएब आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. यानंतर दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र शोएब आता नव्या वादात अडकताना दिसत आहेस.


हा वाद मॅच फिक्सिंगवरून आहे. खरंतर, शोएब मलिक यावेळेस बांगलादेश प्रीमियर लीग खेळत आहे. या दरम्यान त्याने मैदानावर असे काही केले की यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर शोएब मलिक चांगलाच ट्रोल होत आहे.


 


शोएब मलिकने पॉवरप्लेमध्ये केली गोलंदाजी


आता चाहत्यांनी मॅच फिक्सिंगबाबत स्पिन ऑलराऊंडर शोएब मलिकविरोधात तपासाची मागणी केली आहे. बीपीएलमध्ये मलिक फॉर्च्यून बरिशल संघाकडून खेळतो याचे नेतृत्व तमिम इक्बालच्या हाती आहे.


बरिशलने पहिल्यांदा बॅटिंग करताना ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. या दरम्यान मुशफकिर रहीमने ६८ धावांची खेळी केली. जेव्हा खुलना टायगर्स आव्हान परतवण्यासाठी उतरले तेव्हा कर्णधार तमिमने पॉवरप्लेमध्ये शोएब मलिककडून गोलंदाजी करून घेतली. यात तो चांगलाच महागडा ठरला.



एका ओव्हरमध्ये ३ नोबॉल देत दिल्या १८ धावा


४१ वर्षीय शोएब मलिकने डावातील चौथी ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने ३ बॉल नोबॉल टाकले. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मलिकने सलग २ नोबॉल फेकले. दुसऱ्यांदा नोबॉलवरही चौकार लगावला. तर अखेरच्या फ्रीहिटवर षटकार बसला. या पद्धतीने मलिकने सामन्यात एक ओव्हर टाकली. यात त्याने १८ धावा दिल्या.


यावरून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. चाहते मॅच फिक्सिंगवरून तपासाची मागणी करत आहेत. शेवटी खुलना टायगर्सने १८ षटकांत २ विकेट गमावताना सामना जिंकला.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Final Match : जाणून घ्या जिंकणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार?

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद

Lea Tahuhu : न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहू एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त

न्यूझीलंडची वेगवान गोलंदाज ली ताहुहूने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून सर्वांना आश्चर्यचकित केले

T20 World Cup 2026 : जाणून घ्या न्यूझीलंडच्या कर्णधाराला भारतीय संघाबद्दल काय वाटते

- अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या कर्णधाराने केले जसप्रीत बुमराहचे कौतुक मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक

वर्ल्ड कप फायनलसाठी अभिषेक ‘आऊट’, रिंकू सिंग ‘इन’?

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माने केलेली हवा फुसकी निघाली. वर्ल्ड कप स्पर्धेच्या ७

टी-२० वर्ल्डकप कुणीही जिंकला तरी शेवटी इतिहासच घडणार!

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या

भारत-न्यूझीलंड महामुकाबल्यासाठी ऑनलाइन बुकींगला गर्दी

मुंबई (प्रतिनिधी) : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरीत इंग्लंडचा पराभव करत