मुंबई: पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिक सातत्याने चर्चेत आहे. नुकताच शोएब आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा यांचा घटस्फोट झाला आहे. यानंतर दोघेही चांगलेच चर्चेत आहेत. मात्र शोएब आता नव्या वादात अडकताना दिसत आहेस.
हा वाद मॅच फिक्सिंगवरून आहे. खरंतर, शोएब मलिक यावेळेस बांगलादेश प्रीमियर लीग खेळत आहे. या दरम्यान त्याने मैदानावर असे काही केले की यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर शोएब मलिक चांगलाच ट्रोल होत आहे.
आता चाहत्यांनी मॅच फिक्सिंगबाबत स्पिन ऑलराऊंडर शोएब मलिकविरोधात तपासाची मागणी केली आहे. बीपीएलमध्ये मलिक फॉर्च्यून बरिशल संघाकडून खेळतो याचे नेतृत्व तमिम इक्बालच्या हाती आहे.
बरिशलने पहिल्यांदा बॅटिंग करताना ४ बाद १८७ धावा केल्या होत्या. या दरम्यान मुशफकिर रहीमने ६८ धावांची खेळी केली. जेव्हा खुलना टायगर्स आव्हान परतवण्यासाठी उतरले तेव्हा कर्णधार तमिमने पॉवरप्लेमध्ये शोएब मलिककडून गोलंदाजी करून घेतली. यात तो चांगलाच महागडा ठरला.
४१ वर्षीय शोएब मलिकने डावातील चौथी ओव्हर गोलंदाजी केली. यात त्याने ३ बॉल नोबॉल टाकले. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मलिकने सलग २ नोबॉल फेकले. दुसऱ्यांदा नोबॉलवरही चौकार लगावला. तर अखेरच्या फ्रीहिटवर षटकार बसला. या पद्धतीने मलिकने सामन्यात एक ओव्हर टाकली. यात त्याने १८ धावा दिल्या.
यावरून तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे. चाहते मॅच फिक्सिंगवरून तपासाची मागणी करत आहेत. शेवटी खुलना टायगर्सने १८ षटकांत २ विकेट गमावताना सामना जिंकला.
मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…
मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…
मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…
मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…
थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…
मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…