Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर आजपासून सर्वांसाठी खुले; कसे मिळेल रामलल्लाचे दर्शन?

जाणून घ्या मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया


मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) काल रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha) पार पडली. यामुळे हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण देशभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य आणि ऐतिहासिक अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यासाठी जाणून घेऊयात मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया (Schedule and Booking Process).



मंदिर किती वेळ असणार खुले?


अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत दर्शन खुले असणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. पुढे दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.



आरतीची वेळ काय असेल?


मंदिर सर्वांसाठी खुले होण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे ६:३० वाजता या ठिकाणी जागरण/श्रीनगर आरती पार पडेल. या आरतीला केवळ त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. तसंच संध्या आरती ही सायंकाळी ७:३० वाजता असणार आहे. यासाठी देखील केवळ बुकिंग असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.



बुकिंग प्रक्रिया कशी असणार?


पहाटेच्या जागरण आरतीसाठी भाविकांना आधीच्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावं लागणार आहे. किंवा आरतीच्या ३० मिनिटे आधी श्री राम जन्मभूमी कॅम्प ऑफिसमधून आरतीचा पास मिळवता येईल. संध्या आरतीसाठी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा त्याच दिवशी बुकिंग करू शकता.


राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. बुकिंग करण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत सरकारी आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे. याच वेबसाईटवर आरतीसाठी ऑनलाईन पासेस बुक करता येतील. विशेष म्हणजे, आरतीचे पासेस अगदी मोफत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.

Comments
Add Comment

जगभरातील वेबसाइट्स आणि अ‍ॅप्स ठप्प: AWSमध्ये बिघाड, युजर्सना मोठा फटका

नवी दिल्ली : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जगभरातील लाखो इंटरनेट युजर्सना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

मुस्लिम महिलांनी केली श्रीरामाची आरती!

धर्म बदलू शकतो, पण पूर्वज आणि संस्कृती बदलू शकत नाही - नाजनीन अन्सारी वाराणसी : दिवाळीच्या सणादरम्यान, उत्तर

पंतप्रधान मोदींनी आयएनएस विक्रांतवर नौदलासोबत साजरी केली दिवाळी

पणजी : संपूर्ण देश आज दिवाळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहे. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या शूर

उत्पादनांवर ‘ओआरएस’ नाव वापरण्यास मनाई

भारतीय अन्् सुरक्षा आिण मानके प्राधिकरणाचे निर्देश हैदराबाद  : अन्न व्यवसाय संचालकांनी (एफबीओ) त्यांच्या खाद्य

मेंदूची कार्यक्षमता वयाच्या ५५ ते ६० वर्षांदरम्यान असते शिखरावर !

पर्थ : जसजसे वय वाढत जाते, तसतसे आपण स्वत:ला कमकुवत समजतो. आता आपली कार्यशक्ती कमी झाली असे आपल्याला वाटते, पण

चॅट जीपीटीला टक्कर देणार स्वदेशी सर्वम एआय

हिंदीसह १० भारतीय भाषांमध्ये साधणार संवाद नवी दिल्ली  : भारताच्या स्वदेशी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मॉडेल