Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर आजपासून सर्वांसाठी खुले; कसे मिळेल रामलल्लाचे दर्शन?

जाणून घ्या मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया


मुंबई : अयोध्येच्या राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) काल रामलल्लाच्या मूर्तीची पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा (Pran Pratistha) पार पडली. यामुळे हिंदूंची (Hindu) पाचशे वर्षांची प्रतिक्षा संपली. हा अभूतपूर्व क्षण देशभरात अत्यंत आनंद आणि उत्साहात साजरा करण्यात आला. भव्य आणि ऐतिहासिक अशा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर आता अयोध्येतील श्रीराम मंदिर हे सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आलं आहे. यासाठी जाणून घेऊयात मंदिराची आणि आरतीची वेळ व बुकिंग प्रक्रिया (Schedule and Booking Process).



मंदिर किती वेळ असणार खुले?


अयोध्येतील श्रीराम मंदिरात दर्शनाची वेळ ही सकाळी सात वाजेपासून सुरू होणार आहे. सकाळी सात ते दुपारी साडेअकरा वाजेपर्यंत दर्शन खुले असणार आहे. त्यानंतर भाविकांना प्रवेश मिळणार नाही. पुढे दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेपर्यंत पुन्हा हे मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे.



आरतीची वेळ काय असेल?


मंदिर सर्वांसाठी खुले होण्यापूर्वीच, म्हणजे पहाटे ६:३० वाजता या ठिकाणी जागरण/श्रीनगर आरती पार पडेल. या आरतीला केवळ त्यांनाच प्रवेश मिळेल ज्यांनी अ‍ॅडव्हान्स बुकिंग केलं आहे. तसंच संध्या आरती ही सायंकाळी ७:३० वाजता असणार आहे. यासाठी देखील केवळ बुकिंग असणाऱ्यांनाच प्रवेश दिला जाईल.



बुकिंग प्रक्रिया कशी असणार?


पहाटेच्या जागरण आरतीसाठी भाविकांना आधीच्या दिवशी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करावं लागणार आहे. किंवा आरतीच्या ३० मिनिटे आधी श्री राम जन्मभूमी कॅम्प ऑफिसमधून आरतीचा पास मिळवता येईल. संध्या आरतीसाठी तुम्ही आधीच्या दिवशी किंवा त्याच दिवशी बुकिंग करू शकता.


राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वेबसाईटवर याबाबत माहिती दिली आहे. बुकिंग करण्यासाठी तुमच्याजवळ अधिकृत सरकारी आयडी प्रूफ असणं गरजेचं आहे. याच वेबसाईटवर आरतीसाठी ऑनलाईन पासेस बुक करता येतील. विशेष म्हणजे, आरतीचे पासेस अगदी मोफत आहेत. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही.

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे