ICC Awards 2023: आयसीसीच्या टी-२० संघात भारताचा जलवा, सूर्या बनला कर्णधार

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून वर्ष २०२३साठीच्या पुरस्कारांची घोषणा झाली आहे. सर्वात आधी आयसीसी पुरुष टी-२० टीम ऑफ द ईयरची घोषणा झाली आहे.

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळाला. भारताच्या चार खेळाडूंना यात स्थान मिळाले आहे. पुरुषांच्या संघाचा कर्णधार आयसीसीने सूर्यकुमार यादवला बनवले आहे.

संघात सूर्याशिवाय यशस्वी जायसवाल, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंह यांचाही समावेश आहे. संघात भारताचे ४, झिम्बाब्वेचे २, तर न्यूझीलंड इंग्लंड वेस्ट इंडिज, आयर्लंड, युगांडाचा प्रत्येकी एक एक खेळाडू आहे. म्हणजेच आयसीसीच्या या संघात भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे.

आयसीसी मेन्स टी-२० टीम ऑफ द ईयर २०२३


१. यशस्वी जयसवाल (भारत)

२. फिल साल्ट (इंग्लंड)

३. निकोलसन पूरन (विकेटकीपर) (वेस्टइंडीज)

४. सूर्यकुमार यादव (कर्णधार) (भारत)

५. मार्क चैपमैन (न्यूजीलंड)

६.सिकंदर रजा (जिम्बाब्वे)

७. अल्पेश रमजानी (युगांडा)

८. मार्क अडायर (आर्यंलंड)

९. रवि बिश्नोई  (भारत)

१०. रिचर्ड नगारवा (जिम्बाब्वे)

११. अर्शदीप सिंह  (भारत)
Comments
Add Comment

अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवीन स्पॉन्सर; प्रत्येक सामन्यासाठी बीसीसीआयला देणार ४.५ कोटी रुपये

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघासाठी नवीन जर्सी स्पॉन्सर म्हणून अपोलो

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या