Tata group : टाटा समूहाकडून अयोध्येत उभारलं जाणार हॉटेल; यूपीची होणार चांदी!

यूपीच्या वार्षिक उत्पन्नात होणार तब्बल 'इतकी' वाढ


अयोध्या : अयोध्येत काल राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) पार पडलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा (RamLalla Pran Pratistha) सोहळ्याला अनेक देशातील नामवंत उद्योगपतींनी आवर्जून हजेरी लावली होती. यावेळी राम मंदिराच्या निर्मितीमध्ये मोठा वाटा असलेल्या टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) देखील उपस्थित होते. मंदिराच्या निर्मितीनंतर आता टाटाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने (Tata Group IHCL) मोठी घोषणा केली आहे. कंपनीने उत्तर प्रदेशातील अयोध्या शहरात तिसरे हॉटेल उघडण्याचे कंत्राट जाहीर केले आहे.


टाटा समूहाकडून आता अयोध्या शहराचा चेहरामोहरा बदलवण्याचा प्रयत्न असून अयोध्येत एक मोठं हॉटेल सुरू करण्यात येणार आहे. उत्तर प्रदेशमध्ये टाटा समूहाची दोन मोठी हॉटेल्स असून अयोध्येतील हे तिसरे हॉटेल असणार आहे. आयएचसीएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पुनित चटवाल ​​म्हणाले की, रामजन्मभूमी मंदिराच्या उद्घाटनानंतर अयोध्या हे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येत आहे. हे शहर जगभरातील पर्यटकांचा ओघ आकर्षित करण्यासाठी सज्ज आहे.


टाटा समूहाच्या इंडियन हॉटेल्सने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, अयोध्येत निर्मित होणारे हे हॉटेल १.३ एकरमध्ये पसरलेले असेल. ज्यामध्ये १५० खोल्या असतील. हे हॉटेल इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) ब्रँडच्या नियंत्रणाखाली निर्मित केलं जाईल.


यूपीची होणार चांदी; वार्षिक उत्पन्नात होणार २५ हजार कोटींची वाढ


अयोध्येच्या संपूर्ण बदलाची तयारी सुरू आहे. केवळ टाटा समूहच नाही तर देशातील इतर समूह आणि हॉटेल कंपन्याही येथे गुंतवणूक करत आहेत. रिअॅल्टी क्षेत्रातही प्रचंड गुंतवणूक होत आहे. या शहरात २५ हजार कोटी रुपयांची ग्रीनफिल्ड सिटी उभारण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार आहे. रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. एकूणच शहरात १० अब्ज डॉलर्स म्हणजेच ८० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्याच्या वार्षिक उत्पन्नात २५ हजार कोटींची वाढ अपेक्षित आहे.


Comments
Add Comment

ICEYE भारतात उपग्रह उत्पादन सुरू करणार

नवी दिल्ली : अंतराळ-आधारित गुप्तचर क्षेत्रातील जगातील आघाडीची कंपनी 'आय-साय' (ICEYE) पुढील एका वर्षात भारतात आपले

Fire : रतलामजवळ राजधानी एक्सप्रेसला आग

रतलाम : तिरुवनंतपुरम-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसला (गाडी क्रमांक १२४३१) मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात

Education : १ जुलैपासून इयत्ता ९ वी आणि १० वीसाठी तीन भाषा अनिवार्य, CBSE चा निर्णय

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून इयत्ता ९ वी आणि १० वीच्या भाषा

NEET UG 2026 Paper Leak : नीट २०२६ पेपरफुटी प्रकरण : सीबीआयची मोठी कारवाई, एनटीएच्या बायोलॉजीच्या प्राध्यापिकेला पुण्यातून अटक

नवी दिल्ली : 'नीट-युजी' (NEET-UG) परीक्षेत झालेल्या गैरव्यवहाराप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) तपासाची चक्रे

'पाकिस्तानने ठरवावे की त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा ?'

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला आणि त्यांची हत्या केली. या

PM Modi : 'द हेग'मध्ये जाणवला महाराष्ट्र, राजस्थान आणि यूपीचा उत्साह! पंतप्रधान मोदींकडून नेदरलँड्समधील अनिवासी भारतीयांचे विशेष कौतुक

हेग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी १६ मे रोजी नेदरलँड्समधील 'द हेग' (The Hague) शहरात अनिवासी भारतीयांच्या