Ashish Shelar : भगवान श्री काळारामासमोर उभ्या ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल...

  173

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) आज रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. देशविदेशातील रामभक्तांना या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचं निमंत्रण उशिरा देण्यात आलं. यावरुनही अनेक राजकीय वाद प्रतिवाद झाले. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा (Nashik Kalaram Mandir) दौरा निश्चित केल्याने अयोध्येत जाण्याचे टाळले. यावर आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत.


भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल, असं म्हणत आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.





जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातीरावर थयथयाट आहे! जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचे ९ महत्वाचे निर्णय !

विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी विविध योजनांची कार्यपद्धती प्रभावीरित्या

न्यायमूर्ती शिंदे समितीला मुदतवाढ, जरांगे मुंबईत येणार की नाही येणार लवकरच ठरणार

मुंबई : फडणवीस सरकारच्या निर्देशानुसार मराठा आरक्षण उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक मंत्रालयात झाली. उपसमितीचे

'अंबाजोगाई येथे १ हजार १५० खाटांचे रुग्णालय उभारावे'

मुंबई : मराठवाड्यातील ग्रामीण भागासाठी वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा अधिक सक्षम व्हावी, यासाठी बीड जिल्ह्यातील

'दिवेआगरच्या सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकर सुरू करा'

मुंबई : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मत्स्यव्यवसाय महाविद्यालय उभारण्याची योजना

मुंबई : मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड, मौजे सौंदाळे, जामसंडे येथे शासकीय

'नांदेड-मुंबई ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार'

मुंबई : मराठवाड्याच्या विकासासाठी शासन दळणवळण सुविधांवर भर देत आहे. ‘वंदे भारत एक्स्प्रेस’मुळे नांदेड शहर