Ashish Shelar : भगवान श्री काळारामासमोर उभ्या ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल...

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) आज रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. देशविदेशातील रामभक्तांना या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचं निमंत्रण उशिरा देण्यात आलं. यावरुनही अनेक राजकीय वाद प्रतिवाद झाले. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा (Nashik Kalaram Mandir) दौरा निश्चित केल्याने अयोध्येत जाण्याचे टाळले. यावर आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत.


भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल, असं म्हणत आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.





जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातीरावर थयथयाट आहे! जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत साधणार मान्यवरांशी संवाद - वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत हे मुंबईत समाजातील विविध

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्वपूर्ण ठरणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या करारांतर्गत ९ जिल्ह्यांतील ५ हजारांहून अधिक महिला शेतकऱ्यांना शाश्वत शेतीचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

जागतिक मनुष्यबळ तयार करणे आणि स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार तत्पर - कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा

महाराष्ट्र राज्य कौशल्य स्पर्धेचे मंत्री लोढा यांच्या हस्ते उदघाटन मुंबई : जगातील अत्यावश्यक मनुष्यबळाची

नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरलं आणि... खारमधील हृदयपिळवणारा प्रकार

मुंबई : खार पश्चिम येथे नवजात बालिकेला कचऱ्याच्या पिशवीत भरून इमारतीतील रिफ्युजी रूममध्ये फेकून दिल्याचा

US-India Trade Deal: मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून भारत-अमेरिका मुक्त व्यापार कराराचे कौतुक

मुंबई: भारत युरोप मुक्त व्यापार करारानंतर आता भारत अमेरिका या दोन देशांमध्ये मुक्त करार झाला आहे. स्वतः

ठाणे जिल्ह्यात महापौर पदावर ‘लाडक्या बहीणीं’चे राज्य

पद आरक्षित नसतानाही शिवसेनेकडून तीन महापालिकांत महिलांना संधी मुंबई : महापालिका निवडणूक पार पडल्यानंतर आता