Ashish Shelar : भगवान श्री काळारामासमोर उभ्या ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल...

आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल


मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) आज रामलल्लाच्या (Ramlalla) मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) होणार आहे. देशविदेशातील रामभक्तांना या सोहळ्याचं निमंत्रण आलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना या सोहळ्याचं निमंत्रण उशिरा देण्यात आलं. यावरुनही अनेक राजकीय वाद प्रतिवाद झाले. तोपर्यंत उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचा (Nashik Kalaram Mandir) दौरा निश्चित केल्याने अयोध्येत जाण्याचे टाळले. यावर आता भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत.


भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल, असं म्हणत आशिष शेलार यांनी ट्वीट करत लिहिले आहे की, पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत, ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली, लालबागच्या राजावर पण बंदी आणली, रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली, रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली, राम काल्पनिक म्हणणाऱ्या काँग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का?, अशी जोरदार टीका आशिष शेलार यांनी केली आहे.





जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातीरावर थयथयाट आहे! जो न रहा राम का, वो न किसी काम का! अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर कडवट टीका केली आहे.

Comments
Add Comment

Devendra fadanvis : मुंबईत आता 'AI' करणार प्रदूषणाचे मॉनिटरिंग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई : मुंबईतील वाढते वायू प्रदूषण आणि बांधकामाच्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणारे नियम यावर आज विधान परिषदेत

मुंबईहून मिरा भाईंदर ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास होणार सुसाट

मुंबई: मुंबई शहरातून बरीच लोक अनेक उपनगरात कामानिमित्ताने जात असतात. ज्यात मुंबई ते पालघर जाणाऱ्यांची संख्याही

मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आकार ४२४८ कोटींचा; शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवडकर यांना सादर केला अर्थसंकल्प

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाचा स्वतंत्र अर्थसंकल्प बुधवारी सकाळी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८० हजार कोटी?

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिका चा सन २०२६-२७ या आर्थिक

महापालिका सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाहिली श्रध्दांजली

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानिमित्त महापालिका सभागृहात शोक प्रस्तावाद्वारे

Drink and Drive New Rules Maharashtra: दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर...; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी परिवहन विभागाने आता कंबर कसली आहे. विशेषतः समृद्धी