अयोध्येवरून परतल्यावर मोदींनी केली पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषणा, १ कोटी घरांवर लागणार रूफटॉप सोलार

Share

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अयोध्येत राम मंदिरामध्ये भगवान रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केल्यानंतर मोठ्या सोलार योजनेची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की अयोध्येत रामल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हा संकल्प मांडला की देशवासियांच्या घराच्या छतावर त्यांची सोलार सिस्टीम असावी. पंतप्रधान मोदींच्या घोषणेनुसार एक कोटी घरांमध्ये या योजनेंतर्गत रूफटॉप सोलार असेल.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी आपल्या अधिकृत सोशल मीडियावर सांगितले, सूर्यवंशी भगवान श्री राम यांच्या आलोके जगातील सर्व भक्तगण सदैव उर्जा प्राप्त करतात. अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने माझा हा संकल्प आणखी दृढ झाला की भारतवासियांच्या घराच्या छतावर त्यांचे स्वत:चे सोलर रूफ टॉप सिस्टीम असावा.

अयोध्येवरून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की आमचे सरकार १ कोटी घरांवर रूफटॉ सोलार लावण्याच्या लक्ष्यासह पंतप्रधान सूर्योदय योजनेचा प्रारंभ करणार. यामुळे गरीब आणि मध्यम वर्गीय लोकांचे विजेचे बीलही कमी होईल सोबतच भारत उर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनेल.

ही कॅलेंडरवरील एक तारीख नाही तर एक नव्या कालचक्राचा उगम

पंतप्रधान मोदींनी उपस्थित लोकांना सांगितले ते आताही गर्भगृहात प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमादरम्यान जाणवलेल्या त्या दिव्य स्पंदनांचे स्मरण येत आहे.पंतप्रधान मोदींनी आपल्या ३६ मिनिटांच्या भाषणात म्हटले की २२ जानेवारी २०२४चा हा सूर्य नवे तेज घेऊन आला. ही कॅलेंडरवरची एक तारीख नाही तर एका नव्या कालचक्राचा उगम आहे. आमचे रामल्ला आता तंबूत राहणार नाहीत तर ते या दिव्य मंदिरात राहतील.

Recent Posts

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…

11 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

31 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

1 hour ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

2 hours ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago