दिल्लीत सकाळच्या सत्रातील शाळा राहणार बंद, राम मंदिर प्राण प्रतिष्ठेबाबत घेतला निर्णय

नवी दिल्ली: अयोध्येत उद्या श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दिल्ली सरकारद्वारे संचलित शाळा सोमवारी बंद राहतील. दरम्यान, संध्याकाळच्या सत्रातील शाळा दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होतील.

रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत दिल्लीच्या शिक्षण विभागाने सांगितले सामान्य आणि सकाळच्या सत्रात काम करणारे दिल्लीचे सर्व सरकारी आणि सहकारी सहाय्यता प्राप्त शाळा २२ जानेवारीला बंद राहतील. याआधी दिल्ली सरकारने सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली होती.

शनिवारी दिल्लीच्या उपराज्याल वीके सक्सेना यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सर्व सरकारी कार्यालये, शहरी स्थानिक संस्थ्या, स्वायत्त संस्था, उपक्रम आणि मंडळांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली होती.

दिल्लीच्या प्रशासकीय सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्यासुट्टीसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा सरकारनेही अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. काही राज्यांनी तर या दिवशी दारू विक्री आणि खरेदीवरही बंदी घातली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार गोव्यातही २२ जानेवारीला सार्वजिक सुट्टी जाहीर करण्यात आली आणि सरकारी कार्यालये आणि शाळा बंद राहतील. यातच त्रिपुरामध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान राज्यातील सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील.
Comments
Add Comment

अयोध्येतील राम मंदिर उद्या दुपारनंतर राहणार बंद

अयोध्या : रविवारी चंद्रग्रहणामुळे रामनगरी अयोध्येतील रामललांचे दर्शन दुपारनंतर घेता येणार नाही. ग्रहणाचे वेध

आई-वडील, सासू-सास-यांसोबत वेळ घालवण्यासाठी मिळणार रजा!

गुवाहाटी: पालकांसोबत आणि सासरच्यांसोबत वेळ घालवण्यासाठी आसाम सरकारने नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांना २

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील ४५ शिक्षकांचा 'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२५' ने सन्मान, महाराष्ट्रातील ४ शिक्षकांचा समावेश

नवी दिल्ली:  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शिक्षक दिनानिमित्त देशभरातील ४५ शिक्षकांना 'राष्ट्रीय शिक्षक

...म्हणून एअर इंडियाच्या १६१ प्रवासी असलेल्या विमानाचे तातडीने लँडिंग

इंदूर : एअर इंडियाच्या इंदूर - दिल्ली विमानाने दिल्लीच्या दिशेने प्रवास सुरू केला. उड्डाण करुन विमान दिल्लीच्या

मणिपूर राष्ट्रीय महामार्ग-२ कुकींच्या तावडीतून मुक्त होणार

राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार नवी दिल्ली: मागील दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये कुकी आणि

Floods in Punjab: पंजाबमध्ये पूरपरिस्थिती आणखीन बिकट, मृतांचा आकडा ४३ वर... १६५५ गावे प्रभावित

चंदीगड : पंजाब राज्यात पूरपरिस्थिती आणखीन बिकट झाली आहे. आणखीन सहा जणांना आपला जीव गमवावा लागला असल्यामुळे,