दिल्लीत सकाळच्या सत्रातील शाळा राहणार बंद, राम मंदिर प्राण प्रतिष्ठेबाबत घेतला निर्णय

नवी दिल्ली: अयोध्येत उद्या श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त दिल्ली सरकारद्वारे संचलित शाळा सोमवारी बंद राहतील. दरम्यान, संध्याकाळच्या सत्रातील शाळा दुपारी अडीच वाजल्यापासून सुरू होतील.

रविवारी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत दिल्लीच्या शिक्षण विभागाने सांगितले सामान्य आणि सकाळच्या सत्रात काम करणारे दिल्लीचे सर्व सरकारी आणि सहकारी सहाय्यता प्राप्त शाळा २२ जानेवारीला बंद राहतील. याआधी दिल्ली सरकारने सर्व कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्या सुट्टीची घोषणा केली होती.

शनिवारी दिल्लीच्या उपराज्याल वीके सक्सेना यांनी अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनानिमित्त सर्व सरकारी कार्यालये, शहरी स्थानिक संस्थ्या, स्वायत्त संस्था, उपक्रम आणि मंडळांना अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर केली होती.

दिल्लीच्या प्रशासकीय सरकारी कार्यालयांना अर्ध्या दिवसाच्यासुट्टीसह मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि गोवा सरकारनेही अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. काही राज्यांनी तर या दिवशी दारू विक्री आणि खरेदीवरही बंदी घातली आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार गोव्यातही २२ जानेवारीला सार्वजिक सुट्टी जाहीर करण्यात आली आणि सरकारी कार्यालये आणि शाळा बंद राहतील. यातच त्रिपुरामध्ये राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान राज्यातील सर्व कार्यालये आणि शैक्षणिक संस्था दुपारी २.३० वाजेपर्यंत बंद राहतील.
Comments
Add Comment

Jobs Alert : १२ वी नंतर विमानतळावर करिअरची मोठी संधी; लाखोंचं पॅकेज आणि हाय-प्रोफाईल लाईफस्टाईल, जाणून घ्या सविस्तर

मुंबई : सध्याच्या काळात विमान वाहतूक (Aviation) क्षेत्र हे जगातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या उद्योगांपैकी एक

Middle East War : इराण-इस्रायल युद्धात भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू, १० सैनिकही जखमी!

कुवेत सिटी : मध्य-पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता अधिक व्यापक आणि हिंसक बनत चालला आहे. या

Shabbir Ahmed Lone LeT Terrorist Arrest : लष्कर-ए-तोयबाचा मास्टरमाईंड जेरबंद, लाल किल्ला हादरवण्याचा मोठा कट उधळला

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीला हादरवून सोडण्याचा दहशतवाद्यांचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अत्यंत

आनंदाची बातमी, ९४ हजार मेट्रिक टन LPG घेऊन दोन टँकर भारताकडे रवाना

नवी दिल्ली : मागील एक महिन्यापासून पश्चिम आशियात अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण असे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे

Maan ki Baat, Narendra Modi : "मन की बात"मधून पंतप्रधानांचे ऊर्जा संकटावरील अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन

नवी दिल्ली : जागतिक संघर्ष आणि ऊर्जा संकटावर चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात'

भरधाव वेगाने येत थारने तीन जणांना उडवले; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

नवी दिल्ली: गुरुग्राममध्ये एक मोठा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने येणाऱ्या थार कारने तिघांना चिरडले. तिघांचाही