IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका, सर्व ५ कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकते मोहम्मद शमी

मुंबई: इंग्लंडविरूद्ध २५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सर्व ५ कसोटीतून बाहेर होऊ शकतो. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीला पहिल्या दोन कसोटी सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.


अखेरच्या तीन कसोटीत शमीच्या पुनरागमनची आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र शमीची दुखापत अधिक गंभीर असल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. इतकंच नव्हे तर शमीला चांगल्या उपचारासाठी लंडनला पाठवले जाऊ शकते.


मोहम्मद शमीने विश्वचषकातील ७ सामने खेळताना सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. मात्र विश्वचषकानंतरपासूनच शमीच्या टाचेची दुखापत सुरू झाली आणि तो संघातून बाहेर गेला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शमीला तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की शमी नॅशनल क्रिकेट अकादमीचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पटेल यांच्यासोबत लंडनला रवाना होणार आहेत.



सूर्या आणि पंतवरही परदेशात उपचार


रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की शमीने एनसीएमध्ये पटेलसमोर गोलंदाजीचा सराव केला. यानंतर हे समोर आले की शमीला अद्यापही उपचाराची गरज आहे. आता शमीला लंडन पाठवण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच बीसीसीआयकडून शमीच्या फिटनेसबाबत अपडेट दिले जाऊ शकते.


याआधी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला उपचारासाठी जर्मनीला पाठवले होते. जर्मनीमध्ये सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया झाली होती. आयपीएलमध्ये सूर्यकुमारचे पुनरागमन शक्य आहे. दरम्यान सूर्यकुमार यादव सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.

Comments
Add Comment

क्रिकेट विश्वात जेमिमाच्या मैत्रीचीच चर्चा!

वाईट काळामधून स्मृती मानधनाला बाहेर काढायला मदत नवी दिल्ली : मैत्रीण कशी असावी, याचे उत्तम उदाहरण जेमिमा

Rohit Sharma-Virat Kohli Vijay Hazare Trophy 2025-26 : रोहित-विराटचा पहिल्या सामन्यात शतकी धमाका! दुसऱ्या फेरीत कोणाशी भिडणार? जाणून घ्या वेळ, मैदान आणि लाइव्ह अपडेट्सची ए टू झेड माहिती

भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये सध्या 'विराट-रोहित' नावाच्या वादळाने चाहत्यांना भुरळ घातली असून, विजय हजारे

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख