IND Vs ENG: टीम इंडियाला मोठा झटका, सर्व ५ कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकते मोहम्मद शमी

Share

मुंबई: इंग्लंडविरूद्ध २५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या मालिकेआधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. टीमचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सर्व ५ कसोटीतून बाहेर होऊ शकतो. टाचेला झालेल्या दुखापतीमुळे मोहम्मद शमीला पहिल्या दोन कसोटी सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.

अखेरच्या तीन कसोटीत शमीच्या पुनरागमनची आशा व्यक्त करण्यात आली होती. मात्र शमीची दुखापत अधिक गंभीर असल्याने त्याचे पुनरागमन लांबणीवर गेल्याचे दिसत आहे. इतकंच नव्हे तर शमीला चांगल्या उपचारासाठी लंडनला पाठवले जाऊ शकते.

मोहम्मद शमीने विश्वचषकातील ७ सामने खेळताना सर्वाधिक २४ विकेट मिळवल्या होत्या. मात्र विश्वचषकानंतरपासूनच शमीच्या टाचेची दुखापत सुरू झाली आणि तो संघातून बाहेर गेला. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार मोहम्मद शमीला तज्ञांचा सल्ला घेण्यासाठी लंडनला पाठवण्याची तयारी सुरू झाली आहे. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की शमी नॅशनल क्रिकेट अकादमीचे स्पोर्ट्स सायन्स हेड नितीन पटेल यांच्यासोबत लंडनला रवाना होणार आहेत.

सूर्या आणि पंतवरही परदेशात उपचार

रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की शमीने एनसीएमध्ये पटेलसमोर गोलंदाजीचा सराव केला. यानंतर हे समोर आले की शमीला अद्यापही उपचाराची गरज आहे. आता शमीला लंडन पाठवण्याची तयारी सुरू आहे. आतापर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र लवकरच बीसीसीआयकडून शमीच्या फिटनेसबाबत अपडेट दिले जाऊ शकते.

याआधी बीसीसीआयने सूर्यकुमार यादवला उपचारासाठी जर्मनीला पाठवले होते. जर्मनीमध्ये सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया झाली होती. आयपीएलमध्ये सूर्यकुमारचे पुनरागमन शक्य आहे. दरम्यान सूर्यकुमार यादव सुरूवातीच्या सामन्यांमधून बाहेर होऊ शकतो.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

26 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

26 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

28 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

41 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

45 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago