Nagpur News : शेकोटीसाठी लावलेल्या आगीत घर पेटलं! दोन चिमुकल्यांचा झाला मृत्यू

  61

घराबाहेर पळाल्याने मोठी बहीण बचावली


नागपूर : नागपुरात (Nagpur News) एक धक्कादायक आगीची घटना घडली. नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला आग (Fire) लागली. आईबाबा घरात नसताना तीन मुलांनी थंडी वाजत असल्याने घरातच शेकोटी पेटवली. मात्र, या शेकोटीची आग पसरली आणि अख्खं घर जळालं. यात ७ वर्षांची मोठी बहीण घराबाहेर पळाल्याने बचावली. मात्र, दोन लहान भावंडांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


ज्यावेळी आग लागली त्यावेळी बहिणीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रुग्णवाहिकेला देखील तातडीने बोलावण्यात आले. पण तोपर्यंत दोन्ही भावांचा भाजल्याने मृत्यू झाला होता.


घरातील लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. झोपडीवजा घराला ही आग लागली. आगीच्या वेळी घरात दोन सिलेंडर होते. पण त्या सिलेंडरपर्यंत आग पोहचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाला आग विझवण्यात यश आले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.



नेमकं काय घडलं?


थंडी वाजत असल्याने घरातच या भावंडांनी शेकोटी पेटवली. त्यावेळी या मुलांचे वडील कामावर होते. तसेच मुलांची आई ही शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेली होती. घरात ही तीनच भावंडं असताना घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे या मुलांची बहीण घाबरुन गेली आणि गोंधळून बाहेर आली. पण तिचे दोन्ही भाऊ मात्र घरामध्येच अडकले. या चिमुरड्यांना या आगीतून बाहेर देखील पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. देवांश उईके आणि प्रभास उईके अशी या दोघांची नावे आहेत.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली