Nagpur News : शेकोटीसाठी लावलेल्या आगीत घर पेटलं! दोन चिमुकल्यांचा झाला मृत्यू

  66

घराबाहेर पळाल्याने मोठी बहीण बचावली


नागपूर : नागपुरात (Nagpur News) एक धक्कादायक आगीची घटना घडली. नागपूरच्या सेमिनरी हिल परिसरात गोविंद गोरखडे कॉम्प्लेक्स शेजारी एका घराला आग (Fire) लागली. आईबाबा घरात नसताना तीन मुलांनी थंडी वाजत असल्याने घरातच शेकोटी पेटवली. मात्र, या शेकोटीची आग पसरली आणि अख्खं घर जळालं. यात ७ वर्षांची मोठी बहीण घराबाहेर पळाल्याने बचावली. मात्र, दोन लहान भावंडांना बाहेर पडता न आल्याने त्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. काल रात्री ९ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.


ज्यावेळी आग लागली त्यावेळी बहिणीने आरडाओरडा सुरु केला. त्यानंतर स्थानिक लोक मदतीसाठी धावून आले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रुग्णवाहिकेला देखील तातडीने बोलावण्यात आले. पण तोपर्यंत दोन्ही भावांचा भाजल्याने मृत्यू झाला होता.


घरातील लहान मुलांनी पेटवलेल्या शेकोटीमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. झोपडीवजा घराला ही आग लागली. आगीच्या वेळी घरात दोन सिलेंडर होते. पण त्या सिलेंडरपर्यंत आग पोहचण्यापूर्वी अग्निशमन विभागाच्या पथकाला आग विझवण्यात यश आले. त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.



नेमकं काय घडलं?


थंडी वाजत असल्याने घरातच या भावंडांनी शेकोटी पेटवली. त्यावेळी या मुलांचे वडील कामावर होते. तसेच मुलांची आई ही शेजाऱ्यांकडे कामानिमित्त गेली होती. घरात ही तीनच भावंडं असताना घराला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे या मुलांची बहीण घाबरुन गेली आणि गोंधळून बाहेर आली. पण तिचे दोन्ही भाऊ मात्र घरामध्येच अडकले. या चिमुरड्यांना या आगीतून बाहेर देखील पडता आले नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. देवांश उईके आणि प्रभास उईके अशी या दोघांची नावे आहेत.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक