Rajan Salvi : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ; राजन साळवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल!

  92

आज सकाळीच साळवींच्या घरावर एसीबी टीमने टाकली धाड


रत्नागिरी : लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गट (Thackeray Group) अधिकाधिक अडचणीत सापडत चालला आहे. कालच ठाकरे गटाचे सूरज चव्हाण यांना कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली. त्यानंतर आता एसीबीच्या चौकशीनंतर (ACB Inquiry) ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्पन्नापेक्षा ११८ टक्के संपत्ती जास्त असल्याचा उल्लेख आरोपपत्रामध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपपत्रात त्यांच्या पत्नी, मुलगा यांच्या नावाचा देखील नावाचा समावेश आहे. त्यामुळे साळवींना अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


आज सकाळी एसीबीच्या टीमने राजन साळवी यांच्या घरावर धाड टाकली. दोन तासांपासून त्यांच्या घराची झाडाझडती सुरु आहे. याआधीही एसीबी चौकशी आणि त्यांना लागणारी माहिती यासाठी राजन साळवींनी सहावेळा अलिबागच्या एसीपी कार्यालयात हजेरी लावली आहे. त्यानंतर एसीबीकडून राजन साळवींचा बंगला आणि रत्नागिरी शहरातील हॉटेलचं मूल्यांकन करण्यात आलं होतं. त्यात घर आणि हॉटेलच क्षेत्रफळ, एकूण जमिनीची किंमत, तसेच इंटरियर डिझाईनिंग अर्थात सजावटीसाठी करण्यात आलेला खर्च यांचं मूल्यांकन करण्यात आलं.


एसीबी चौकशीमुळे राजन साळवी यांच्यासाठी निर्माण झालेल्या अडचणी आणखी वाढताना दिसत आहेत. लाचलुचपत विभागाने काही दिवसांपूर्वी राजन साळवींच्या कुटुंबीयांना नोटीस धाडून चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितलं होतं. साळवी यांची पत्नी, मुलगा, भाऊ, पुतणे यांची देखील चौकशी करण्यात आली.


त्यानंतर आज सकाळी रत्नागिरीतील त्यांच्या निवासस्थानी एसीबीकडून झाडाझडती सुरू झाली. सध्या साळवी आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या संपत्तीचे मूल्यांकन केले जात आहे. आरोपपत्रानुसार त्यांनी दाखवलेल्या संपत्तीपेक्षा त्यांची संपत्ती अधिक आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप त्यांच्या घराच्या झाडाझडतीचे काम सुरुच आहे. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसीबी काय कारवाई करते हे पाहावं लागेल.

Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती