मुंबई: भारताने अफगाणिस्तानला १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात डबल सुपर ओव्हरच्या थ्रिलर सामन्यात मात दिली. या पद्धतीने भारताने अफगाणिस्तानला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले.
दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णयही शेवटच्या मिनिटात घेण्यात आला. या सुपर ओव्हरसाठी आवेश खान गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र त्यानंतरही रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेण्यात आला याचा खुलासा झाला आहे.
याबाबत खुद्द बिश्नोईने सांगितले की हा बदल अखेरच्या मिनिटात करण्यात आला होता. बिश्नोईने सामन्यानंतर सांगितले की, आम्हाला दोघांना(आवेश खानलाही) तयार राहण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा त्यांनी दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आत येताना पाहिले तेव्हा त्यांनी मला लेग बाऊंड्रीसोहत गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांचा इशारा रोहितच्या दिशेने होता.
टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टीला दुजोरा की बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा विचार रोहितचा बोता. यासाठी कोणतीही रणनीती बनवण्यात आली नव्हती. शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…