Ravi Bishnoi: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रोहितने आवेशऐवजी रवी बिश्नोईला का दिली संधी? झालाय खुलासा

मुंबई: भारताने अफगाणिस्तानला १७ जानेवारीला बंगळुरूमध्ये झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात डबल सुपर ओव्हरच्या थ्रिलर सामन्यात मात दिली. या पद्धतीने भारताने अफगाणिस्तानला ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० असे क्लीन स्वीप केले.


दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णयही शेवटच्या मिनिटात घेण्यात आला. या सुपर ओव्हरसाठी आवेश खान गोलंदाजीसाठी तयार होता. मात्र त्यानंतरही रवी बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा निर्णय घेण्यात आला याचा खुलासा झाला आहे.


याबाबत खुद्द बिश्नोईने सांगितले की हा बदल अखेरच्या मिनिटात करण्यात आला होता. बिश्नोईने सामन्यानंतर सांगितले की, आम्हाला दोघांना(आवेश खानलाही) तयार राहण्यास सांगितले होते. मात्र जेव्हा त्यांनी दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज आत येताना पाहिले तेव्हा त्यांनी मला लेग बाऊंड्रीसोहत गोलंदाजी करण्यास सांगितले. त्यांचा इशारा रोहितच्या दिशेने होता.



बिश्नोईला गोलंदाजी करायला दिल्याने द्रविडने केले रोहितचे कौतुक


टीम इंडियाचा हेड कोच राहुल द्रविडने प्रेस कॉन्फरन्समध्ये या गोष्टीला दुजोरा की बिश्नोईला गोलंदाजी देण्याचा विचार रोहितचा बोता. यासाठी कोणतीही रणनीती बनवण्यात आली नव्हती. शेवटच्या क्षणी हा निर्णय घेण्यात आला होता.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे