Ram Mandir Inauguration : राम मंदिरासाठी ऑनलाईन पास व प्रसादाची सोय? वेळीच व्हा सावध!

ऑनलाईन होतेय फसवणूक


अयोध्या : अयोध्येतील बहुप्रतिक्षित राम मंदिराचा (Ayodhya Ram Mandir) उद्घाटन सोहळा (Ram Mandir Inauguration) आता केवळ चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेसाठी (Ramlalla Pran Pratishtha) अयोध्येसोबतच अख्खा देश सजला आहे. या अभूतपूर्व सोहळ्याचा साक्षीदार होण्याची प्रत्येक रामभक्ताची इच्छा आहे. मात्र, याचा काहीजणांकडून गैरफायदा घेतला जात आहे. अयोध्येमध्ये राममंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी उपस्थित राहण्यासाठी व्हीआयपी पास देण्याचे आमिष दाखवून भाविकांची फसवणूक केली जात असल्याच्या काही घटना उघडकीस आल्या आहेत. या प्रकरणी विश्व हिंदू परिषद आणि मंदिर ट्रस्टच्या वतीने सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.


सदर फसवणुकीबाबत 'आमच्यातर्फे पैसे घेऊन असे कोणतेही पास देण्यात येत नसून भाविकांनी फसवणुकीपासून सावध राहावे', असे मंदिर ट्रस्ट आणि विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे व्हीआयपी पास सोबतच ऑनलाईन वस्तूंची विक्री करणाऱ्या काही संकेतस्थळांवर अयोध्येतील रामाचा प्रसादही ऑनलाईन विक्रीस उपलब्ध असल्याचे सांगत लोकांची फसवणूक करण्यात येत आहे. अशा पद्धतीने प्रसादासाठी ऑनलाईन सेवा नसल्याचेही ट्रस्टने स्पष्ट केले आहे.



अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींना सुरुवात


अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या विधींची मंगळवारी जोरदार सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत बुधवारी राममूर्तीचा मंदिर परिसर प्रवेश विधी संपन्न झाला. त्याचप्रमाणे सकाळी कलश पूजनही करण्यात आले. शरयू नदीच्या तीरावर झालेल्या या कलश पूजनाला राजमजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. ट्रस्टचे सदस्य अनिल मिश्रा यांनी या विधीमध्ये सपत्नीक सहभागी होत कलश पूजनाचे विधी केले. या विधीनंतर शरयूमधील जल कलशांतून राममंदिरात नेण्यात आले. आता सर्वांनाच २२ जानेवारीच्या क्षणाची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या