दिल्ली दारू घोटाळा प्रकरण, चौथ्यांदा ED समोर हजर नाही होणार केजरीवाल!

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(CM Arvind kejriwal) दारू घोटाळा प्रकरणी चौथ्यांदा अंमलबजावणी संचलनालयासमोर(ED) हजर राहण्याची शक्यता नाही. ईडीने गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांना चौथ्यांदा समन्स जारी करताना १८ जानेवारीला सादर होण्यास सांगितले होते. दरम्यान, आज ते गोव्याच्या ३ दिवसीय यात्रेसाठी रवाना होत आहेत.


दिल्ली सरकार आणि आम आदमी पक्षाशी संबंधित सूत्रांनी बुधवारी सांगितले की ईडीसमोर मुख्यमंत्री केजरीवाल सादर होण्याची शक्यता नाही कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीची माहिती देण्यासाठी त्यांचा तीन दिवसांचा गोव्याचा दौरा नियोजित आहे.



प्रजासत्ताकदिनामुळे गोवा दौऱ्याचा कार्यक्रम लांबणीवर


मुख्यमंत्री केजरीवाल याआधी ११ जानेवारीला दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर जाणार होते. मात्र
राष्ट्रीय राजधानीत दिल्लीत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांच्या तयारीमुळे त्यांना हा दौरा रद्द करावा लागला होता.



ईडीचे समन्स अवैध - केजरीवाल


५५ वर्षीय केजरीवाल यांना ईडीने २ नोव्हेंबर, २२ डिसेंबर आणि ३ जानेवारीला समन्स जारी केले होते. दरम्यान, तीनही वेळा ते ईडीसमोर सादर झाले नाहीत. सीएम केजरीवाल यांनी ईडीच्या या समन्सवर सवाल करताना ते अवैध असल्याचे म्हटले होते.


सीएम केरीवाल २ नोव्हेंबरला पहिल्या समन्सच्यावेळेस मध्य प्रदेश दौऱ्यावर निघाले होते. तेथे त्यांनी एक रॅली घेतली होती. तर २२ डिसेंबरला दुसऱ्या समन्सच्या वेळेस मुख्यमंत्री मेडिटेशन रिट्रीटसाठी पंजाबमध्ये होते. तर ३ जानेवारीला मुख्यमंत्री केजरीवाल प्रजासत्ताक दिनाच्या तयारींसह दिल्लीत तीन जागांसाठी चाललेल्या राज्यसभा निवडणुकीचा हवाला देत ईडीसमोर सादर झाले नव्हते.

Comments
Add Comment

नोव्हेंबरपासून देशात सुरू होणार नवे नियम, जाणून घ्या सविस्तर!

नवी दिल्ली: ऑक्टोबर महिना काहीच दिवसात संपणार असून येणाऱ्या नवीन महिन्यापासून देशभरात आधारकार्डपासून

१ नोव्हेंबरपासून जीएसटी नोंदणी आणखी सोपी होणार

नवी दिल्ली :  केंद्र सरकारने १ नोव्हेंबरपासून वस्तू आणि सेवा कर नोंदणी आणखी सोपी करण्यासाठी नवी प्रणाली सुरू

जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’

नवी दिल्ली : विज्ञान, तंत्रज्ञान आणि तंत्रज्ञानाधारित नवोन्मेषाच्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट आणि

'तो' एक फोन आणि आयुष्याचा शेवट, आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या रोहिणी कलमची आत्महत्या!

मध्यप्रदेश: आशियाई खेळात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोहिणी कलमने गळफास घेत आत्महत्या केली आहे. रोहिणी

कुर्नूल येथे झालेल्या भीषण अपघाताचे कारण आले समोर! फॉरेन्सिक रिपोर्टच्या आधारे पोलिसांनी केली प्रकरणाची पुष्टी

हैदराबाद: आंध्र प्रदेशातील कुर्नूल येथे २४ ऑक्टोबरला झालेल्या भीषण बस अपघातप्रकरणी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.

मराठी, मल्याळम, तेलुगू, कन्नड… यांसारख्या ११ भाषांतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली 'मन की बात'

 मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' याचा १२७ व भाग प्रसारित झाला. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी