Badlapur Fire News : बदलापूरच्या केमिकल कंपनीत भीषण आग! एकाचा मृत्यू तर चारजण जखमी

बदलापूर : बदलापूरच्या (Badlapur) खरवई या भागात असलेल्या व्ही. के. केमिकल कंपनीत (Chemical Company) आज भीषण आग (Fire News) लागली. या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला तर चार कामगार गंभीर जखमी झाले आहेत. अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु केले. जे कामगार जखमी अवस्थेत होते त्यांना बाहेर काढून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.


व्ही. के. केमिकल कंपनीत रासायनिक केमिकलवर प्रक्रिया केली जात होती. दरम्यान, आज पहाटे पाचच्या दरम्यान स्फोट झाले. या स्फोटामुळे कंपनी पेटली. हे स्फोट इतके भयंकर होते की चार ते पाच किलोमीटर अंतरावर त्याचे हादरे बसले. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला. इतर चार कामगार गंभीर अवस्थेत जखमी झाले आहेत.


या कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली असं कंपनीतील कामगारांचं म्हणणं आहे. अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसी मधील अग्निशमन दल ताबडतोब घटनास्थळी दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले.

Comments
Add Comment

Nitesh Rane : मोरा मच्छीमारांना नुकसानभरपाई द्या; मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : जे. एन. पी. ए. मार्फत(JNPA) मार्फत चौथ्या बंदराच्या भरावाच्या कामामुळे मोरा गावातील मच्छीमारांचे झालेले

लग्न जमेना म्हणून तरुणाची भन्नाट कल्पना, थेट बॅनरवर पठ्ठ्याने लिहिलं असं काही की तुम्हांलाही ऐकून धक्का बसेल

पुणे : लग्न जमत नाही म्हणून अनेक तरुण सध्या नैराश्यात दिसत आहे. मुलीच्या तसेच वडिलांच्या एकंदरीतच

भोंदू अशोक खरातच्या अडचणीत वाढ, कुटुंबियांचीही वाढणार अडचण; कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर..., हालचालींना वेग

नाशिक : संपूर्ण देशालाच हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

Santosh Deshmukh : 'त्यांच्यावर कुटुंबीयांचा दबाव'..., मस्साजोगच्या सरपंचपदाच्या उमेदवाराचा खळबळजनक आरोप

संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या सरपंच संतोष देशमुख ( Santosh Deshmukh ) यांच्या मस्साजोग या गावात राजकीय वातावरण रंगले

Pune Water Supply : पुण्याच्या पाणीकपातीवर प्रशासनाने घेतला हा महत्वाचा निर्णय

पुणे : सूर्याचा प्रकोप हा वाढत जातोय, तापमानाचा पारा इतका वाढलाय की थेट तापमान ४०- ४५ अंशापर्यत जाऊन पोहोचलाय,

Free Registration For Agricultural Land : राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतजमिनीच्या वाटणीवरील नोंदणी फी रद्द

मुंबई : राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा देत राज्य सरकारने शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर