Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणानंतर २० हजारांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचा अंदाज

Share

अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. ही धार्मिक बाजू झाली. पंरतु धार्मिक नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अयोध्या परिसरात राम मंदिरामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून अर्थकारणालाही गती मिळणार आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाशी संबंधित दुसरे सेक्टरसुद्धा ही संधी साधून घेण्यासाठी खूप उत्साहीत आहेत. खासकरुन हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्म सेक्टरला खूप बूस्ट मिळणार आहे.

२२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिन्ही इंडस्ट्रीमध्ये जवळपास २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी स्टाफिंग कंपन्यांना अपेक्षा आहे. पुढची २० ते ३० वर्ष अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे.

रेडस्टँड इंडियामध्ये स्टाफिंग आणि रेडस्टँड टेक्नोलॉजीजे चीफ कमर्शियल ऑफिसर यशब गिरी यांनी सांगितले की, ‘अयोध्येत पुढची काही वर्ष दररोज ३ ते ४ लाख भाविक येतील, ते एक ग्लोबल टूरिज्म सेंटरमध्ये बदलणार आहे. या भागात निवासी व्यवस्था आणि ट्रॅव्हलच्या मागणीत वाढ झाली आहे. अयोध्येच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. भाविकांसाठी पायभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येईल. रेडस्टँडला अपेक्षा आहे की, दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच २० हजारापासून ते २५ हजारापर्यंत कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या स्वरुपात तयार होतील. हॉटेल स्टाफ, हाऊसकिपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि टूर गाइड या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील’.

‘मागच्या सहा महिन्यात हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्मशी संबंधित कमीत कमी १० हजार आणि जवळपास २०,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत’ असे टीमलीजचे कंज्यूमर एवं ईकॉमर्स वाइस प्रेसीडेंट आणि हेड बालासुब्रमण्यम ए यांनी सांगितले आहे. यात हॉटेल कर्मचारी, शेफ, सर्वर्स, ड्राइव्हरचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अधिकाऱ्यांनुसार हॉस्पिटॅलिटी मॅनेजर्स, रेस्टॉरंट आणि हॉटल कर्मचारी, लॉजिस्टिक्स मॅनेजर्स, ड्रायव्हर्स आदी क्षेत्रात नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त अयोध्येतच नाही, लखनऊ, कानपूर, गोरखपूरमध्ये मागणी आणि पुरवठा याची काय स्थिती असेल, यावर हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालकांची नजर असेल.

Tags: ayodhya

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

41 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

1 hour ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

2 hours ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago