Ayodhya : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पणानंतर २० हजारांहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती होणार असल्याचा अंदाज

अयोध्या : अयोध्येत (Ayodhya) राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. ही धार्मिक बाजू झाली. पंरतु धार्मिक नाण्याची दुसरी बाजू म्हणजे अयोध्या परिसरात राम मंदिरामुळे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार असून अर्थकारणालाही गती मिळणार आहे. त्यामुळे उद्योग व्यवसायाशी संबंधित दुसरे सेक्टरसुद्धा ही संधी साधून घेण्यासाठी खूप उत्साहीत आहेत. खासकरुन हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्म सेक्टरला खूप बूस्ट मिळणार आहे.


२२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल, असा अंदाज आहे. भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तिन्ही इंडस्ट्रीमध्ये जवळपास २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी स्टाफिंग कंपन्यांना अपेक्षा आहे. पुढची २० ते ३० वर्ष अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे.


रेडस्टँड इंडियामध्ये स्टाफिंग आणि रेडस्टँड टेक्नोलॉजीजे चीफ कमर्शियल ऑफिसर यशब गिरी यांनी सांगितले की, ‘अयोध्येत पुढची काही वर्ष दररोज ३ ते ४ लाख भाविक येतील, ते एक ग्लोबल टूरिज्म सेंटरमध्ये बदलणार आहे. या भागात निवासी व्यवस्था आणि ट्रॅव्हलच्या मागणीत वाढ झाली आहे. अयोध्येच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. भाविकांसाठी पायभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येईल. रेडस्टँडला अपेक्षा आहे की, दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच २० हजारापासून ते २५ हजारापर्यंत कायमस्वरुपी आणि तात्पुरत्या स्वरुपात तयार होतील. हॉटेल स्टाफ, हाऊसकिपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि टूर गाइड या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील’.


‘मागच्या सहा महिन्यात हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्मशी संबंधित कमीत कमी १० हजार आणि जवळपास २०,००० नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत’ असे टीमलीजचे कंज्यूमर एवं ईकॉमर्स वाइस प्रेसीडेंट आणि हेड बालासुब्रमण्यम ए यांनी सांगितले आहे. यात हॉटेल कर्मचारी, शेफ, सर्वर्स, ड्राइव्हरचा समावेश आहे. हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अधिकाऱ्यांनुसार हॉस्पिटॅलिटी मॅनेजर्स, रेस्टॉरंट आणि हॉटल कर्मचारी, लॉजिस्टिक्स मॅनेजर्स, ड्रायव्हर्स आदी क्षेत्रात नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा २०२५ च्या पहिल्या सहा महिन्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त अयोध्येतच नाही, लखनऊ, कानपूर, गोरखपूरमध्ये मागणी आणि पुरवठा याची काय स्थिती असेल, यावर हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालकांची नजर असेल.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.