IND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय, अफगाणिस्तानला केले क्लीन स्वीप

बंगळुरू: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दमदार मालिका विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला विजयासाठी २१३ धावा हव्या होत्या. मात्र अफगाणिस्तानच्या संघाने २१२ धावा केल्या आणि सामना बरोबरीत झाला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर झाली. मात्र सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या.


यामुळे दुसऱ्यांदा सुपर ओव्हर घेण्यात आले. यात भारताने ११ धावा केल्या तर अफगाणिस्तानच्या संघाला केवळ एक धाव करता आली. या पद्धतीने भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. भारताने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ९व्यांदा एखाद्या संघाला क्लीन स्वीप केले आहे. यासोबतच भारताच्या नावावर सर्वाधिक वेळा क्लीन स्वीप करण्याचा रेकॉर्ड झाला आहे.


भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सामन्यात एक वेळ अशी स्थिती आली होती की भारतीय संघाने अवघ्या २२ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या ोत्या. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेला १ धावा तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.

यानंतर रोहित शर्माने ६४ बॉलमध्ये शतक ठोकत नवा इतिहास रचला. रिंकू सिंहनेही आपले टी-२० आंतरराष्ट्रीयमधील अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात रोहितने ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले.
Comments
Add Comment

IND W vs AUS W : भारतीय संघ दिमाखात फायनलमध्ये, ऑस्ट्रेलियाला केले चारीमुंड्या चीत, आता द. आफ्रिकेशी होणार लढत

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला वनडे वर्ल्डकपच्या सेमीफायनल सामन्यात भारताने बलाढ्य

शरद पवार-फडणवीस एकत्र! 'या' नेत्यांना मोठा धक्का! नक्की काय घडलं?

मुंबई : राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांविरोधात उभे ठाकणारे भाजपचे नेते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल

सेमीफायनल सामन्यात काळी पट्टी बांधून खेळतायेत खेळाडू... कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क!

मुंबई : आयसीसी महिला विश्वचषक २०२५ चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जात आहे.

सेमी फायनलसाठी भारतीय संघात तीन मोठे बदल ; ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वन डे वर्ल्ड कप २०२५ चा सेमी फायनल सामना नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील