IND vs AFG: दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये भारताचा विजय, अफगाणिस्तानला केले क्लीन स्वीप

बंगळुरू: भारतीय संघ आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताने दमदार मालिका विजय मिळवला आहे. तिसऱ्या सामन्यात दुसऱ्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला.


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना २१२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानला विजयासाठी २१३ धावा हव्या होत्या. मात्र अफगाणिस्तानच्या संघाने २१२ धावा केल्या आणि सामना बरोबरीत झाला. त्यानंतर पहिली सुपर ओव्हर झाली. मात्र सुपर ओव्हरमध्येही दोन्ही संघांनी १६-१६ धावा केल्या.


यामुळे दुसऱ्यांदा सुपर ओव्हर घेण्यात आले. यात भारताने ११ धावा केल्या तर अफगाणिस्तानच्या संघाला केवळ एक धाव करता आली. या पद्धतीने भारताने ही मालिका ३-० अशी जिंकली. भारताने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ९व्यांदा एखाद्या संघाला क्लीन स्वीप केले आहे. यासोबतच भारताच्या नावावर सर्वाधिक वेळा क्लीन स्वीप करण्याचा रेकॉर्ड झाला आहे.


भारताने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर सामन्यात एक वेळ अशी स्थिती आली होती की भारतीय संघाने अवघ्या २२ धावांमध्ये ४ विकेट गमावल्या ोत्या. यशस्वी ४ धावा करून बाद झाला. तर विराट कोहली पहिल्याच बॉलवर पॅव्हेलियनमध्ये परतला. शिवम दुबेला १ धावा तर संजू सॅमसन शून्यावर बाद झाला.

यानंतर रोहित शर्माने ६४ बॉलमध्ये शतक ठोकत नवा इतिहास रचला. रिंकू सिंहनेही आपले टी-२० आंतरराष्ट्रीयमधील अर्धशतक ठोकले. त्याने ३६ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सामन्यात रोहितने ६९ बॉलमध्ये नाबाद १२१ धावा केल्या. यात त्याने ८ षटकार आणि ११ चौकार लगावले.
Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे