सध्या संपूर्ण देश राममय, रामराज्यात जनताच आहे राजा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आंध्र प्रदेशात म्हटले की आजकाल संपूर्ण देश राममय झाला आहे. महात्मा गांधीही रामराज्याबाबत बोलायचे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या ११ दिवस आधीपासून माझे व्रत सुरू आहे. सध्या संपूर्ण देश राममय आहे. प्रभू रामांच्या जीवनाचा विस्तार, त्यांची प्रेरणा आणि आस्था भक्तीच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रभू राम समाज जीवनातील सुशासनाचे असे प्रतीक आहेत जे आपल्या संस्थानासाठी मोठी प्रेरणा बनू शकतात.


पंतप्रधान मोदींनी सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नारकोटिक्स अकादमीचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले की, भगवान राम नेहमी भरतला सांगत की, ज्या ठिकाणी कमी खर्च आहे ती कामे वेळ न गमावता पूर्ण करतो. गेल्या काही वर्षात आमच्या सरकारनेही हेच केले आहे.



रामराज्याबाबत काय म्हणाले मोदी?


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामराज्य सुशासनाच्या ४ स्तंभावर उभा आहे. हे चार स्तंभ जिथे सन्मानाशिवाय कोणत्याही भयाशिवाय मान वर करून चालू शकू, जिथे नागरिकांसोबत समान व्यवहार होईल, जिथे कर्तव्य सर्वपरी असेल. जनताच राजा आहे आणि सरकार जनतेची सेवा करते.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आम्ही जीएसटीच्या रूपाने देशाला नवी आधुनिकता दिली आहे. ७ लाखापर्यंत आम्ही टॅक्सवर सूट दिली आहे. यामुळे अडीच लाख कोटी टॅक्सची बचत झाली आहे. आज देशात टॅक्स देणारा व्यक्ती हे पाहत आहे की त्याचा टॅक्स योग्य प्रकारे वापरला गेला त्यामुळे तो पुढे होऊन टॅक्स भरत आहे. आम्ही जे काही जनतेकडून घेतले आहे ते जनतेला सम्रपित केले आहे. हेच तर सुशासन आहे.

Comments
Add Comment

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात

'Nanda Devi' Ship : तब्बल ४६,५०० मेट्रिक टनहुन अधिक एलपीजी घेऊन ‘नंदा देवी’ जहाज भारतात दाखल

‘शिवालिक’नंतर आणखी एक एलपीजी टँकर भारतात दाखल झाला आहे. ‘नंदा देवी’ हे जहाज आज म्हणजेच मंगळवार १७ मार्च रोजी

एनआयएची मोठी कारवाई, युक्रेनच्या सहा आणि अमेरिकेच्या एका नागरिकाला अटक

नवी दिल्ली : कोलकाता विमानतळ येथे अमेरिकन नागरिकाला तर लखनऊ विमानतळ आणि दिल्ली विमानतळ येथे प्रत्येकी तीन