सध्या संपूर्ण देश राममय, रामराज्यात जनताच आहे राजा - पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आंध्र प्रदेशात म्हटले की आजकाल संपूर्ण देश राममय झाला आहे. महात्मा गांधीही रामराज्याबाबत बोलायचे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या ११ दिवस आधीपासून माझे व्रत सुरू आहे. सध्या संपूर्ण देश राममय आहे. प्रभू रामांच्या जीवनाचा विस्तार, त्यांची प्रेरणा आणि आस्था भक्तीच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रभू राम समाज जीवनातील सुशासनाचे असे प्रतीक आहेत जे आपल्या संस्थानासाठी मोठी प्रेरणा बनू शकतात.


पंतप्रधान मोदींनी सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नारकोटिक्स अकादमीचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले की, भगवान राम नेहमी भरतला सांगत की, ज्या ठिकाणी कमी खर्च आहे ती कामे वेळ न गमावता पूर्ण करतो. गेल्या काही वर्षात आमच्या सरकारनेही हेच केले आहे.



रामराज्याबाबत काय म्हणाले मोदी?


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामराज्य सुशासनाच्या ४ स्तंभावर उभा आहे. हे चार स्तंभ जिथे सन्मानाशिवाय कोणत्याही भयाशिवाय मान वर करून चालू शकू, जिथे नागरिकांसोबत समान व्यवहार होईल, जिथे कर्तव्य सर्वपरी असेल. जनताच राजा आहे आणि सरकार जनतेची सेवा करते.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आम्ही जीएसटीच्या रूपाने देशाला नवी आधुनिकता दिली आहे. ७ लाखापर्यंत आम्ही टॅक्सवर सूट दिली आहे. यामुळे अडीच लाख कोटी टॅक्सची बचत झाली आहे. आज देशात टॅक्स देणारा व्यक्ती हे पाहत आहे की त्याचा टॅक्स योग्य प्रकारे वापरला गेला त्यामुळे तो पुढे होऊन टॅक्स भरत आहे. आम्ही जे काही जनतेकडून घेतले आहे ते जनतेला सम्रपित केले आहे. हेच तर सुशासन आहे.

Comments
Add Comment

मध्य प्रदेशात कफ सिरप प्रकरणात ११ मुलांच्या मृत्यूनंतर डॉक्टरला अटक

मृतांच्या नातेवाइकांना ४ लाख रुपयांची मदत जाहीर भोपाळ (वृत्तसंस्था): छिंदवाडा जिल्ह्यातील पारसिया भागात कफ

जयपूर SMS हॉस्पिटलच्या ICU मध्ये भीषण आग, ६ रुग्णांचा मृत्यू

जयपूर: राजस्थानची राजधानी जयपूर येथील सवाई मानसिंह (SMS) हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरच्या न्यूरो आयसीयू (ICU)

दार्जिलिंगमध्ये भूस्खलनाने हाहाकार; २३ जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उत्तर बंगालच्या दौऱ्यावर

दार्जिलिंग: पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यातील डोंगराळ प्रदेशात मुसळधार पावसामुळे झालेल्या भीषण

प्रतिकूल हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा ७ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

जम्मू :  जम्मू आणि काश्मीरमधील तीव्र हवामानाच्या इशाऱ्यामुळे, वैष्णोदेवी यात्रा ५ ते ७ ऑक्टोबर दरम्यान स्थगित

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत