प्रहार    

सध्या संपूर्ण देश राममय, रामराज्यात जनताच आहे राजा - पंतप्रधान मोदी

  82

नवी दिल्ली: राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी आंध्र प्रदेशात म्हटले की आजकाल संपूर्ण देश राममय झाला आहे. महात्मा गांधीही रामराज्याबाबत बोलायचे.


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठेच्या ११ दिवस आधीपासून माझे व्रत सुरू आहे. सध्या संपूर्ण देश राममय आहे. प्रभू रामांच्या जीवनाचा विस्तार, त्यांची प्रेरणा आणि आस्था भक्तीच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रभू राम समाज जीवनातील सुशासनाचे असे प्रतीक आहेत जे आपल्या संस्थानासाठी मोठी प्रेरणा बनू शकतात.


पंतप्रधान मोदींनी सीमा शुल्क, अप्रत्यक्ष कर आणि नारकोटिक्स अकादमीचे उद्घाटन केल्यानंतर सांगितले की, भगवान राम नेहमी भरतला सांगत की, ज्या ठिकाणी कमी खर्च आहे ती कामे वेळ न गमावता पूर्ण करतो. गेल्या काही वर्षात आमच्या सरकारनेही हेच केले आहे.



रामराज्याबाबत काय म्हणाले मोदी?


पंतप्रधान मोदी म्हणाले, रामराज्य सुशासनाच्या ४ स्तंभावर उभा आहे. हे चार स्तंभ जिथे सन्मानाशिवाय कोणत्याही भयाशिवाय मान वर करून चालू शकू, जिथे नागरिकांसोबत समान व्यवहार होईल, जिथे कर्तव्य सर्वपरी असेल. जनताच राजा आहे आणि सरकार जनतेची सेवा करते.


पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, आम्ही जीएसटीच्या रूपाने देशाला नवी आधुनिकता दिली आहे. ७ लाखापर्यंत आम्ही टॅक्सवर सूट दिली आहे. यामुळे अडीच लाख कोटी टॅक्सची बचत झाली आहे. आज देशात टॅक्स देणारा व्यक्ती हे पाहत आहे की त्याचा टॅक्स योग्य प्रकारे वापरला गेला त्यामुळे तो पुढे होऊन टॅक्स भरत आहे. आम्ही जे काही जनतेकडून घेतले आहे ते जनतेला सम्रपित केले आहे. हेच तर सुशासन आहे.

Comments
Add Comment

किश्तवाडमधील ढगफुटीत ४० हून अधिक जणांचा मृत्यू, १५० जण बेपत्ता

जम्मू : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड येथील चशोटी गावात गुरुवारी दुपारी १२:३० वाजता ढगफुटी झाली. डोंगरावरून

SIR प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : बिहारमधील SIR प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत दिग्गज वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

स्वातंत्र्य दिनानिमित्त १०९० जणांना शौर्य/सेवा पदके जाहीर, महाराष्ट्राचे मानकरी येथे पहा...

महाराष्ट्रातल्या ०७ पोलिसांना शौर्य पदक, ०३ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक ३९ पोलिसांना

मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले आणि...

नवी दिल्ली : दिल्लीत कालकाजी येथे मुसळधार पावसात दुचाकीवर झाड कोसळले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले.

Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा हाहाकार, किन्नौर ढगफुटीने उध्वस्त; घरं-गाड्या पुरात गेल्या वाहून

किन्नौर : हिमाचल प्रदेशात निसर्गाने पुन्हा एकदा आपला प्रकोप दाखवला आहे. किन्नौर जिल्ह्यातील ऋषी डोंगरी खोऱ्यात

राहुल गांधींच्या वकिलांचा यु-टर्न: “जीवाला धोका” म्हणणारा अर्ज परत घेणार

नवी दिल्ली : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वकिलांनी पुणे येथील न्यायालयात गांधींना वादी