घरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

मुंबई: भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कोणासाठीही सोपे नाही. सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. असे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा झाले नाही की घरच्या मैदानावर भारताने टी-२० मालिका जिंकली. तर गेल्या १५ मालिकांमध्ये भारताला कोणीही हरवू शकलेले नाही. १५वी मालिका अफगाणिस्तानविरुद्ध सुरू आहे.


टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये गमावली होती. ही २ सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये भारताला हरवत मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही.



जून २०१९ पासून दमदार रेकॉर्ड


टीम इंडियाने जून २०१९ पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर १५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात त्यांनी १३ मालिका जिंकल्या आहेत तर बाकी २ मालिका अनिर्णित राहिल्या.



जून २०१९ पासून घरच्या मैदानावर टीम इंडिया


मालिका खेळल्या - १५
भारताने जिंकल्या - १३
भारताने गमावल्या - ०
मालिका अनिर्णीत - २



१७ जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० सामना


अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीनन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

IPL 2026 MI vs RCB : मुंबई इंडियन्स बंगळुरु रॉयल चॅलेंजर्स विरुद्ध जोरदार पुनरागमन करणार ?

मुंबई : आयपीएलच्या १९ व्या हंगामात पुन्हा एकदा संथ सुरुवात झाल्यानंतर, मुंबई इंडियन्स आता आपल्या परिचित आणि

IPL 2026 Points Table : १५ सामन्यांनंतर राजस्थान रॉयल्स टॉपवर; हे ४ संघ प्लेऑफच्या रेसमध्ये आघाडीवर

मुंबई : आयपीएल २०२६ मध्ये आतापर्यंत १५ सामने पूर्ण झाले असून स्पर्धा आता रंगात आली आहे. काही संघ जबरदस्त

IPL 2026 Wanindu Hasaranga : लखनऊची डोकेदुखी वाढली! स्टार स्पिनर हसरंगा उर्वरित स्पर्धेतून बाहेर

श्रीलंकेचा लेगस्पिनर वानिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) दुखापतीमुळे चालू आयपीएल हंगामातून बाहेर पडला आहे. त्याच्या

IPL 2026: लखनौचा कमबॅक, KKR अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत

मुंबई : आयपीएल २०२६ मधील रंगतदार सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 3 विकेटने या सामन्याला रंग

IPL 2026 : सामना न खेळणाऱ्या खेळाडूंसाठी बीसीसीआयने जाहीर केली नवीन नियमावली; नियमांचे पालन न केल्यास होणार कारवाई

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलसाठी अनेक कठोर नियम लागू केले आहेत. या नवीन

Bangladesh Cricket Board : अखेर बांगलादेश नरमला; बांग्लादेश क्रिकेट बोर्डाकडून भारताला आमंत्रण

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (बीसीबी) (Bangladesh Cricket Board) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसी) पत्र लिहून कळवले आहे की,