घरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

  52

मुंबई: भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कोणासाठीही सोपे नाही. सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. असे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा झाले नाही की घरच्या मैदानावर भारताने टी-२० मालिका जिंकली. तर गेल्या १५ मालिकांमध्ये भारताला कोणीही हरवू शकलेले नाही. १५वी मालिका अफगाणिस्तानविरुद्ध सुरू आहे.


टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये गमावली होती. ही २ सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये भारताला हरवत मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही.



जून २०१९ पासून दमदार रेकॉर्ड


टीम इंडियाने जून २०१९ पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर १५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात त्यांनी १३ मालिका जिंकल्या आहेत तर बाकी २ मालिका अनिर्णित राहिल्या.



जून २०१९ पासून घरच्या मैदानावर टीम इंडिया


मालिका खेळल्या - १५
भारताने जिंकल्या - १३
भारताने गमावल्या - ०
मालिका अनिर्णीत - २



१७ जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० सामना


अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीनन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

"१८ वर्षापूर्वीचं का उकरून काढलं?" थप्पड कांड व्हिडिओ लिकने भज्जी संतापला

नवी दिल्ली: ललित मोदी यांनी मायकेल क्लास यांच्यासोबत एका पॉडकास्टमध्ये आयपीएल २००८ च्या हंगामात गाजलेल्या

महिला वर्ल्ड कप खेळणारे संघ होणार करोडपती

दुबई : भारतात ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक सुरु होत आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षीस रकमेची घोषणा

Asia Cup 2025 : भारताचा सलग दुसऱ्या विजयासह सुपर-४ मध्ये प्रवेश; जपानवर मात

पाटणा : भारतीय संघाने आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर-४ मध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. रंगतदार लढतीत भारतीय

रोहित शर्मासह ६ क्रिकेटपटूंची सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस चाचणी होणार

बंगळुरु : रोहित शर्मा, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, वॉशिंग्टन सुंदर, यशस्वी जयस्वाल, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर

टी-२० विश्वचषक २०२६ साठी महेंद्रसिंग धोनी पुन्हा टीम इंडियाचा 'मेंटॉर'? बीसीसीआयने दिली ऑफर!

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी टी-२० विश्वचषक २०२६ साठी टीम इंडियाच्या मेंटरपदाची

Asia Cup 2025 च्या सामन्यांच्या वेळेत बदल! भारत-पाकिस्तान सामना आता कधी सुरू होणार?

नवी दिल्ली: आगामी आशिया कप २०२५ सुरू होण्याआधीच क्रिकेटप्रेमींसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्पर्धेतील