घरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

मुंबई: भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कोणासाठीही सोपे नाही. सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. असे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा झाले नाही की घरच्या मैदानावर भारताने टी-२० मालिका जिंकली. तर गेल्या १५ मालिकांमध्ये भारताला कोणीही हरवू शकलेले नाही. १५वी मालिका अफगाणिस्तानविरुद्ध सुरू आहे.


टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये गमावली होती. ही २ सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये भारताला हरवत मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही.



जून २०१९ पासून दमदार रेकॉर्ड


टीम इंडियाने जून २०१९ पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर १५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात त्यांनी १३ मालिका जिंकल्या आहेत तर बाकी २ मालिका अनिर्णित राहिल्या.



जून २०१९ पासून घरच्या मैदानावर टीम इंडिया


मालिका खेळल्या - १५
भारताने जिंकल्या - १३
भारताने गमावल्या - ०
मालिका अनिर्णीत - २



१७ जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० सामना


अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीनन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

ICC ODI Rankings: कोहलीचा अव्वल सिंहासनावरून पायउतार, डॅरिल मिशेल नंबर-वन

ICC ODI Rankings : आयसीसी वनडे क्रमवारीत मोठा आणि मनाला वेदना देणारा बदल पाहायला मिळाला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी

ड्रीम-११ आणि माय-११ नंतर गुगलचा बीसीसीआयला आधार

मुंबई : बीसीसीआय पूर्वी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांकडून भरपूर उत्पन्न मिळवत होते. मात्र आता अशावेळी बोर्ड हे नुकसान

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्ती

गुडघ्याच्या दुखापतीने कारकिर्दीला पूर्णविराम मुंबई : भारतीय बॅडमिंटनला जागतिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून

‘ए+’ श्रेणीतून विराट, रोहित, बुमराहला डच्चू?

बीसीसीआयच्या करारात ट्विस्ट : मानधनात कपात होण्याची शक्यता नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर

विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची परीक्षा

नागपुरात आज न्यूझीलंडविरुद्ध पहिली टी-२० लढत ; पांड्या, बुमराह, श्रेयसवर लक्ष नागपूर : न्यूझीलंडविरुद्धच्या

कर्णधार सूर्यकुमार यादव गाठणार ‘शतकी’ टप्पा

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून नागपूरच्या विदर्भ