घरच्या मैदानावर टीम इंडियाचे क्रिकेटर आहेत शेर

मुंबई: भारताला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कोणासाठीही सोपे नाही. सध्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. यातील सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताने या मालिकेत आधीच आघाडी घेतली आहे. असे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा झाले नाही की घरच्या मैदानावर भारताने टी-२० मालिका जिंकली. तर गेल्या १५ मालिकांमध्ये भारताला कोणीही हरवू शकलेले नाही. १५वी मालिका अफगाणिस्तानविरुद्ध सुरू आहे.


टीम इंडियाने घरच्या मैदानावर शेवटची मालिका फेब्रुवारी २०१९मध्ये गमावली होती. ही २ सामन्यांची मालिका होती. ऑस्ट्रेलियाने दोन्ही सामन्यांमध्ये भारताला हरवत मोठी कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्ध फेब्रुवारी टी-२० मालिकेनंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही मालिका गमावलेली नाही.



जून २०१९ पासून दमदार रेकॉर्ड


टीम इंडियाने जून २०१९ पासून ते आतापर्यंत घरच्या मैदानावर १५ टी-२० मालिका खेळल्या आहेत. यात त्यांनी १३ मालिका जिंकल्या आहेत तर बाकी २ मालिका अनिर्णित राहिल्या.



जून २०१९ पासून घरच्या मैदानावर टीम इंडिया


मालिका खेळल्या - १५
भारताने जिंकल्या - १३
भारताने गमावल्या - ०
मालिका अनिर्णीत - २



१७ जानेवारीला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० सामना


अफगाणिस्तानविरुद्ध सुरू असलेल्या तीनन सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना १७ जानेवारीला रंगणार आहे. या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसरा सामना जिंकत भारतीय संघ मालिकेत निर्भेळ यश मिळवण्याचा प्रयत्न करेल.

Comments
Add Comment

टी ट्वेंटी वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात संथ अर्धशतक

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

ओमानविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा विजय, पवन रथनायके सामनावीर

पल्लेकेले : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये गुरुवारी दुपारी झालेल्या साखळी सामन्यात श्रीलंकेने ओमानचा

T20 World Cup 2026: 'या' खेळाडूला अंपायरशी वाद घालणं पडलं महागात

श्रीलंका: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पंचांच्या निर्णयाचे उल्लंघन केल्याबद्दल अफगाणिस्तानचा अनुभवी

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या