Jio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

मुंबई: जिओ आणि एअरटेलमध्ये अनेकदा टक्कर पाहायला मिळते. मग ते प्लान्स असो वा नेटवर्क. प्रत्येक गोष्टीत दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असते. त्यातच आता या दोनही कंपनींच्या ५जी यूजर्सना झटका लागू शकतो.


२०२४मध्ये काही महिन्यांनी जिओ आणि एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा प्लान संपवणार आहे. यासोबतच या प्लान्सची किंमत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.


नव्या रिपोर्टनुसार ४जी टॅरिफच्या मदतीने कंपन्या रेव्हेन्यू ग्रोथ वाढवण्यावर जोर देत आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये जिओ आणि एअरटेलने ५जी सर्व्हिस लाँच केली होती. यानंतर ४जी इंटरनेटच्या किंमतीत युजर्सना ५ जी इंटरनेट दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड ५जी ऑफर लवकरच संपणार आहे. कारण दोनही कंपन्या ५जी सर्व्हिस प्लान्समध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.


दोन्ही कंपन्या भारतात ५जी बाबत सातत्याने काम करत आहे. जिओ आणि एअरटेलचे १२५ मिलियनहून अधिक युजर्स आहेत. २०२४मध्ये ५जी युजर्सची संख्या २०० मिलियन पार करू शकते. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार एअरटेल आणि जिओ आपल्या ५जी डेटा प्लान्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करू शकते.

Comments
Add Comment

MLA Pramod Jathar : 'वनतारा'च्या धर्तीवर तिलारी खोऱ्यात राष्ट्रीय उद्यान?

- भाजप आमदार प्रमोद जठार यांची मागणी; वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मुंबई : सिंधुदुर्ग

Mumbai News : मुंबईतील जुन्या भागांचे रूप पालटणार

म्हाडाचे ९२५ एकरांवर ११ महत्त्वाकांक्षी प्रकल्प, ४ लाख कोटींची होणार गुंतवणूक मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील

Minister Shivendrasinhraje Bhosale : रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य; आंबेनळी घाटासह अपघातप्रवण मार्गांवर विशेष उपाययोजना

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती मुंबई : राज्यातील नागरिकांना

Uday Samant : सिंधुदुर्गमध्ये 'मालवणी भाषा भवन' उभारणार

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा; पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार मुंबई : कोकणची समृद्ध संस्कृती

Chandrashekhar Bawankule : राज्यात आणखी ८८ नवी महसूल कार्यालये

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा; हरकती-सूचनांसाठी १५ दिवसांची जाहीर सूचना जारी मुंबई : राज्यातील

पोक्रा' योजनेत पोलादपूरचा समावेश आता अशक्य; आमदार प्रवीण दरेकरांच्या प्रश्नावर मंत्री आशिष जयस्वाल यांचं उत्तर

मुंबई : जागतिक बँकेच्या कडक अटी आणि करारातील तांत्रिक बाबींमुळे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या (पोक्रा