Jio-Airtel यूजर्सना लागणार झटका, तुम्ही वापरता का?

मुंबई: जिओ आणि एअरटेलमध्ये अनेकदा टक्कर पाहायला मिळते. मग ते प्लान्स असो वा नेटवर्क. प्रत्येक गोष्टीत दोन्ही कंपन्यांमध्ये टक्कर सुरू असते. त्यातच आता या दोनही कंपनींच्या ५जी यूजर्सना झटका लागू शकतो.


२०२४मध्ये काही महिन्यांनी जिओ आणि एअरटेलचा अनलिमिटेड ५जी डेटा प्लान संपवणार आहे. यासोबतच या प्लान्सची किंमत ५ ते १० टक्क्यांपर्यंत वाढवली जाऊ शकते.


नव्या रिपोर्टनुसार ४जी टॅरिफच्या मदतीने कंपन्या रेव्हेन्यू ग्रोथ वाढवण्यावर जोर देत आहेत. ऑक्टोबर २०२२मध्ये जिओ आणि एअरटेलने ५जी सर्व्हिस लाँच केली होती. यानंतर ४जी इंटरनेटच्या किंमतीत युजर्सना ५ जी इंटरनेट दिले जात आहे. मात्र आता अनलिमिटेड ५जी ऑफर लवकरच संपणार आहे. कारण दोनही कंपन्या ५जी सर्व्हिस प्लान्समध्ये बदल करण्याचा विचार करत आहेत.


दोन्ही कंपन्या भारतात ५जी बाबत सातत्याने काम करत आहे. जिओ आणि एअरटेलचे १२५ मिलियनहून अधिक युजर्स आहेत. २०२४मध्ये ५जी युजर्सची संख्या २०० मिलियन पार करू शकते. दरम्यान, मिळालेल्या रिपोर्टनुसार एअरटेल आणि जिओ आपल्या ५जी डेटा प्लान्समध्ये ५ ते १० टक्के वाढ करू शकते.

Comments
Add Comment

Chembur Monorail : चेंबूर-जेकब सर्कल मोनोरेल पुन्हा धावणार; सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं, प्रवाशांची प्रतीक्षा लवकरच संपणार

मुंबई : मुंबईतील चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल (Monorail) मार्गिका पुन्हा सुरू होण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. या

Political News: दिलीप वळसे-पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip

मालाडमध्ये बेस्ट बसचा अपघात; अनेक वाहनांना धडक, महामार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई : मुंबईतील मालाड (Malad Accident) पूर्व परिसरात गुरुवारी सकाळी बेस्ट बसच्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण

BMC News : बेलगाम सल्लागार नियुक्ती बसणार आळा

सल्लागारांच्या निवडीबाबत तत्काळ धोरण बनवण्याचे स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आदेश मुंबई : मुंबई महापालिकेत

High Tide : यंदाच्या पावसाळ्यात २४ वेळा समुद्राला येणार मोठी भरती

जून महिन्यात सलग ६ दिवस मोठ्या भरतीचे मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  यंदाच्या पावसाळ्यात म्हणजेच जून ते सप्टेंबर या ४

BJP-Shivsena : फेरीवाल्यांच्या मुद्यावरून भाजप शिवसेनेत श्रेयाची लढाई

आपल्या प्रयत्नांचे फळ दृष्टीपथात असल्याचा महापौरांचा दावा, शिवसेना म्हणते आमच्या प्रयत्नांना यश मुंबई :