Pandharpur News : पंढरपूरमध्ये तलावात बुडाल्याने तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश


सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrpati Sambhajinagar) खेळता खेळता तलावात बुडल्यामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण संभाजीनगर हळहळलं होतं. मात्र, या घटनेतून सावरत नाही तोच पंढरपुरातून (Pandharpur) अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपुरात शेततलावात बुडल्याने तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे. मनोज अंकुश पवार (वय ११ वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९ वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.


पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

PM Surya Ghar yojana : 'पंतप्रधान सूर्य घर' योजनेत महाराष्ट्राची बाजी

- उत्तर प्रदेश, गुजरातला टाकले मागे; चार महिन्यांत १ लाख ८ हजार घरांवर सौर यंत्रणा मुंबई : स्वच्छ आणि शाश्वत

भव्य राष्ट्रध्वज नागपूरच्या राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरेल - मुख्यमंत्री फडणवीस

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांची आहुती दिली याचा प्रत्येक

Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी २२,१८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

- त्र्यंबक-नाशिकचा कुंभमेळा जगाला आकर्षण वाटणारा असावा - मुख्यमंत्री फडणवीस त्र्यंबक - नाशिक मध्ये सिंहस्थ

धामणगाव गढी परिसरात चक्क अस्वलाचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती जिल्ह्यातील धामणगाव गढी परिसरात अस्वलाचा मुक्त संचार आढळून आल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात