Pandharpur News : पंढरपूरमध्ये तलावात बुडाल्याने तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश


सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrpati Sambhajinagar) खेळता खेळता तलावात बुडल्यामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण संभाजीनगर हळहळलं होतं. मात्र, या घटनेतून सावरत नाही तोच पंढरपुरातून (Pandharpur) अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपुरात शेततलावात बुडल्याने तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे. मनोज अंकुश पवार (वय ११ वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९ वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.


पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

Khopoli News : मुलाला शाळेत सोडलं अन्...; नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीवर दिवसाढवळ्या सपासप वार

खोपोली : रायगड जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक केंद्र असलेल्या खोपोली शहरात आज सकाळच्या सुमारास रक्ताचा थरार

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली