Pandharpur News : पंढरपूरमध्ये तलावात बुडाल्याने तीन शाळकरी मुलांचा मृत्यू

दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश


सोलापूर : दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरात (Chhatrpati Sambhajinagar) खेळता खेळता तलावात बुडल्यामुळे तीन चिमुरड्यांना आपला जीव गमावावा लागल्याची घटना घडली होती. यामुळे संपूर्ण संभाजीनगर हळहळलं होतं. मात्र, या घटनेतून सावरत नाही तोच पंढरपुरातून (Pandharpur) अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. पंढरपुरात शेततलावात बुडल्याने तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.


पंढरपूर तालुक्यातील करकंब (Karakamb) येथील मोडनिंब रोडलगत असलेल्या परदेशी यांच्या शेततलावात पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांसह एका मित्राचा समावेश आहे. मनोज अंकुश पवार (वय ११ वर्षे), गणेश नितीन मुरकुटे (वय ७ वर्षे), हर्षवर्धन नितीन मुरकुटे (वय ९ वर्षे) अशी बुडालेल्या मुलांची नावे आहेत.


पाण्याच्या टॅंकमध्ये तीन लहान मुले पडल्याची घटना करकंब परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसांनी तात्काळ सदर ठिकाणी धाव घेऊन या तलावातून या तीनही शाळकरी मुलांना बाहेर काढलं. नंतर त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे करकंब परिसरात शोककळा पसरली आहे.
Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात