Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रितांना मिळणार 'या' अत्यंत खास भेटवस्तू

अयोध्या : अयोध्येत अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) अखेर उभारले जाणार असल्याने देशभरात जल्लोषाचे वातावरण आहे. देशभरातील रामभक्तांनी या सोहळ्याला आवर्जून हजेरी लावावी, यासाठी घराघरांत निमंत्रण पत्रिका व अक्षता यांचे वाटपही करण्यात येत आहे. याचसोबत आता प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी खास निमंत्रित करण्यात आलेल्या व्यक्तींनाही अत्यंत खास भेटवस्तू (Special Gifts) दिल्या जाणार आहेत.


अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या निमंत्रितांना या मंदिराचा पाया खोदताना काढण्यात आलेली माती बॉक्समधून भेट म्हणून देण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टकडून देण्यात आली. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वतः पंतप्रधान मोदी हे उपस्थित राहणार असून त्यांना अयोध्येतील राम मंदिराची पंधरा मीटरची प्रतिमा एका ज्यूट बॅगमधून भेट म्हणून देण्यात येईल.


या सोहळ्याला अकरा हजार विशेष निमंत्रित उपस्थित राहणार असून त्यांना आकर्षक आणि अविस्मरणीय भेटवस्तू देण्यात येतील. या निमंत्रितांना प्रसाद म्हणून शंभर ग्रॅम वजनाचे मोतीचूरचे लाडू देण्यात येतील. शुद्ध तुपापासून या लाडवांची निर्मिती करण्यात येणार आहे.


निमंत्रितांना भेट म्हणून दोन बॉक्स देण्यात येतील एकामध्ये प्रसादाचे मोतीचूर लाडू आणि तुळशीचे पान असेल तर दुसऱ्या बॉक्समध्ये माती असेल. शरयू नदीतील पाणी भरलेली एक बाटली देखील त्यांना देण्यात येईल. गीता प्रेस गोरखपूरकडून तयार केलेल्या ग्रंथांची एक प्रतही यावेळी देण्यात येईल. या भेटवस्तूंमुळे रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा त्यांच्या चिरकाल स्मरणात राहील, यात शंका नाही.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या