इंदौर: भारतीय संघाने(indian team) इंदौर टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला(india vs afganistan) हरवले. टीम इंडियाने ६ विकेट राखत या सामन्यात विजय मिळवला. भारताच्या समोर विजयासाठी १७३ धावांचे आव्हान होते. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने यशस्वी जायसवाल आणि शिवम दुबे यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने १५.४ षटकांत ४ विकेट गमावताना हे आव्हान पूर्ण केले. यासोबतच भारतीय संघाने तीन सामन्यांची टी-२० मालिका २-० अशी जिंकली.
भारतासाठी यशस्वी जायसवालने सर्वाधिक ३४ बॉलमध्ये ६८ धावा केल्या. या युवा खेळाडूने आपल्या खेळीदरम्यान ५ चौकार आणि ६ षटकार ठोकले. शिवम दुबेने सर्वाधिक ३२ बॉलमध्ये ६३ धावा केल्या. त्याने आपल्या खेळी दरम्यान ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले. विराट कोहलीने या सामन्यात १६ चेंडूत २९ धावांची खेळी केली. याशिवाय भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर फलंदाज जितेश शर्मा शून्यावर बाद झाला.
अफगाणिस्तानसाठी करीम जन्नत सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने भारताच्या दोन गोलंदाजांना बाद केले. याशिवाय फजुल्लाह फारूकी आणि नवीन उल हकला १-१ विकेट मिळवण्यात यश मिळाले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकांत १७२ धावा केल्या. अफगाणिस्तानसाठी ऑलराऊंडर गुलबदीन नईबने सर्वाधिक ३५ बॉलमध्ये ५७ धावा केल्या. भारतासाठी अर्शदीप सिंह यशस्वी गोलंदाज ठरला. अर्शदीप सिंहे ४ ओव्हरमध्ये ३२ धावा देत ३ फलंदाजांना बळी ठरवले.
८ वर्षांचा मुलगा बेपत्ता; वडील शोधत असताना मुलाची केवळ चप्पल मिळाली दिसपूर : सध्या देशभरात…
१५ ते २० प्रवासी जखमी, २ जण गंभीर रायगड : काही दिवसांपूर्वी पोलादपूर (Poladpur) येथे…
पासही काढू शकता ऑनलाईन पुणे : पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी (Pune news) समोर आली आहे.…
भारंगी नदीला पूर, गाड्या वाहून गेल्या, वाहतूकही ठप्प खर्डी : जुलै महिन्याला सुरुवात होताच पावसाने…
अकोल्यातील जवानाला २४ व्या वर्षी आले वीरमरण अकोला : जम्मू-काश्मीरच्या (Jammu Kashmir) कुलगाम जिल्ह्यात काल…
बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यातून एक अतिशय धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. बुलढाण्यात…