Railway Megablock News : मध्य रेल्वेवर रविवारी नाही तर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक; जाणून घ्या महत्त्वाचे बदल

  47

पश्चिम आणि हार्बर मार्गिकेवर काय बदल?


मुंबई : रविवारी बहुतेक लोकांना कामाला सुटी असते, त्यामुळे या दिवशी रेल्वेचा मेगाब्लॉक (Railway Megablock) घेऊन काही कामे उरकली जातात. पण या आठवड्यात मध्य रेल्वेवर (Central Railway) रविवारी नाही तर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी या मार्गिकेवर कोणताही ब्लॉक नसेल. ठाणे ते कल्याण पाचव्या-सहाव्या मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असणार आहे.


वडाळा रोड ते मानखुर्ददरम्यान अप-डाउन मार्गावर हार्बर रेल्वेने (Harbour Railway) रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर (Western Railway) सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.



पश्चिम रेल्वे :


पश्चिम रेल्वेवर सांताक्रुझ ते गोरेगाव अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १० ते सायंकाळी ५ ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक वेळेत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.



हार्बर रेल्वे :


हार्बर रेल्वेवर वडाळा रोड ते मानखुर्द अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे वडाळा रोड ते मानखुर्द, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते वाशी/बेलापूर/पनवेल अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते गोरेगाव लोकल वेळापत्रकानुसार धावतील. पनवेल ते मानखुर्ददरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.



मध्य रेल्वे :


मध्य रेल्वे ठाणे ते कल्याणच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर शनिवारी रात्री ११.४० ते रविवारी पहाटे ३.४० पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकमुळे पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवरील मेल-एक्स्प्रेस जलद अप-डाउन मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे मेल-एक्स्प्रेस १५-२० मिनिटे विलंबाने धावणार आहेत. रात्रकालीन ब्लॉकमुळे सीएसएमटी ते कल्याणदरम्यान रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक