शिवम दुबेच्या रूपात भारताला मिळाला हार्दिक पांड्याचा पर्याय?

मुंबई: शिवम दुबेने अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार फिनिशिंग खेळी करताना भारताला विजय मिळवून दिला होता. दुबेने ४० बॉलमध्ये ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ६० धावा केल्या. याआधी त्याने बॉलिंग करताना एक विकेट मिळवली होती. तसेच त्याने २ ओव्हर गोलंदाजी करत केवळ ९ धावा दिल्या होत्या. त्याच्या या ऑलराऊंडर कामगिरीनंतर भारतीय संघात तो हार्दिक पांड्याला पर्याय असू शकेल का या चर्चांना उधाण आले आहे.


अफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या सामन्यात प्लेयर ऑफ दी मॅच राहणाऱ्या शिवम दुबेने अशा वेळेस चांगली कामगिरी केली जेव्हा हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीमबाहेर आहे. हार्दिक पांड्या भारतीय संघाचा मु्ख्य ऑलराऊंडर आणि पहिली पसंती आहे. २०२३ वनडे विश्वचषकात तो दुखापतग्रस्त झाला होता. मात्र अद्याप तो संघात परतलेला नाही.



शिवम दुबे हार्दिक पांड्याला पर्याय?


हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त आहे. यामुळे वेगवान गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून शिवम दुबेला अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेत संधी मिळाली आहे. शिवम दुबेने पहिल्या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये कमाल केली. जर शिवम दुबेने आयपीएलमध्येही चांगली कामगिरी केली तर तो हार्दिक पांड्याला पर्याय ठरू शकतो.



असे राहिलेय करिअर


शिवम दुबे भारतासाठी व्हाईट बॉल क्रिकेट खेळतो. त्याने आतापर्यंत १ वनडे आणि १९ टी-२० सामने खेळले आहेत. एकमेव वनडेत शिवमने फलंदाजी करताना ९ धावा केल्यात . याशिवाय त्याने टी-२०मध्ये १२ डावांत बॅटिंग करताना ३५.३३च्या सरासरीने आणि १३९.४७च्या स्ट्राईक रेटने २१२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 Ind vs Nam: सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका; बुमराच्या बॉलमुळे ईशान जखमी

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

T20 World Cup 2026 Ind vs Nam: नामिबिया विरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्माला आराम ?

दिल्ली: शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून आयसीसी चा टी२० विश्वचषक सुरू झाला असून गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारत

भारतीय संघाचा नामिबियाविरुद्ध सावध पवित्रा

नवी दिल्ली  : टी-२० विश्वचषक २०२६ च्या सलामीच्या सामन्यात अमेरिकेवर मात केल्यानंतर, भारत आता आपल्या दुसऱ्या

वेस्ट इंडीजचा इंग्लंडवर ३० धावांनी विजय

रदरफोर्डची वादळी फलंदाजी अन् मोटीची 'फिरकी' ठरली निर्णायक मुंबई  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजने आपल्या

भारताला मोठा धक्का, नामिबियाविरुद्धच्या सामन्याआधी महत्त्वाचा खेळाडू रुग्णालयात

मुंबई : भारताने अमेरिकेविरुद्धचा सामना २९ धावांनी जिंकला. आता गुरुवार १२ फेब्रुवारी रोजी भारताचा सामना नामिबिया

वानिंदू हसरंगा विश्वचषकातून बाहेर

कोलंबो  : टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये जेतेपदाचे स्वप्न पाहणाऱ्या श्रीलंकन संघाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा मुख्य