Chhatrapati Sambhaji Nagar : खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवले.


बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावं आहेत. खेळण्यासाठी आलेली काही मुलं तलावात बुडाली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले, मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.



नेमकं काय झालं?


काल ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित मुलं खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, सायंकाळ होऊन देखील ती परतली नाहीत. मुलं घरी का परत आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावातल्यांना मदतीसाठी बोलावले. शोधकार्यानंतर मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.



Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे