Chhatrapati Sambhaji Nagar : खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवले.


बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावं आहेत. खेळण्यासाठी आलेली काही मुलं तलावात बुडाली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले, मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.



नेमकं काय झालं?


काल ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित मुलं खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, सायंकाळ होऊन देखील ती परतली नाहीत. मुलं घरी का परत आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावातल्यांना मदतीसाठी बोलावले. शोधकार्यानंतर मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.



Comments
Add Comment

विरारमध्ये रो-रो फेरीबोट सेवा तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत, प्रवाशांची सुखरूप सुटका

विरार (पालघर): सफाळे ते विरार दरम्यान चालणारी रो-रो (Ro-Ro) फेरीबोट आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत

पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर

पुणे (प्रतिनिधी) : पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधून ५ हजार

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव मदत करणार – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय मंत्री शाह यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा नूतनीकरण

तुळजापूर मंदिरात २ दिवस व्हिआयपी दर्शन बंद

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या मत्स्यव्यावसायिकांना आधार देणार

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द