Chhatrapati Sambhaji Nagar : खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

  57

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवले.


बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावं आहेत. खेळण्यासाठी आलेली काही मुलं तलावात बुडाली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले, मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.



नेमकं काय झालं?


काल ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित मुलं खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, सायंकाळ होऊन देखील ती परतली नाहीत. मुलं घरी का परत आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावातल्यांना मदतीसाठी बोलावले. शोधकार्यानंतर मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.



Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या