Chhatrapati Sambhaji Nagar : खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू!

  54

छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना


छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून (Chhatrapati Sambhaji Nagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील एका तलावात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले. तर, अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात बुडालेल्या चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी घाटी दवाखान्यात पाठवले.


बिस्वजित सुखदेव उपाध्याय कुमार (वय १२ वर्षे), अफरोज जावेद शेख (वय १२ वर्षे), जावेद शेख (वय १२ वर्षे), अबरार जावेद शेख (वय १२ वर्षे) अशी पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या चार मुलांची नावं आहेत. खेळण्यासाठी आलेली काही मुलं तलावात बुडाली असल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी या घटनेची माहिती वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावात दिली. सोबतच तहसीलदार देखील घटनास्थळी पोहचले. त्यांनतर अग्निशमन दलाने पाण्यात बुडालेल्या चारही मुलांना बाहेर काढले, मात्र चौघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.



नेमकं काय झालं?


काल ११ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संबंधित मुलं खेळण्यासाठी घराबाहेर गेली होती. मात्र, सायंकाळ होऊन देखील ती परतली नाहीत. मुलं घरी का परत आली नाहीत म्हणून नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. मुलांचा रांजणगाव शेणपुंजी परिसरात सर्वत्र शोध घेण्यात आला. दरम्यान, मुलांचा शोध घेत काही नातेवाईक तलावाजवळ पोहोचले. यावेळी त्यांना तलावालगत अफरोज, अबरार तसेच इतर दोन मुलांचे कपडे दिसून आले. त्यामुळे मुले तलावात बुडाल्याचा त्यांना संशय आला. त्यांनी ताबडतोब वाळूज अग्निशमन विभाग, एमआयडीसी वाळूज पोलीस व गावातल्यांना मदतीसाठी बोलावले. शोधकार्यानंतर मुलांचे मृतदेह मिळून आले. ते पाहून नातेवाईकांनी हंबरडा फोडला. त्यामुळे घटनास्थळी आणि गावात शोककळा पसरल्याचे पाहायला मिळाले.



Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती