Satyajit Tambe : लोकशाहीचा महाकुंभ यशस्वी करण्यासाठी युवकांची भूमिका महत्वाची : सत्यजीत तांबे

पुणे येथे आदर्श युवा आमदार पुरस्काराने आमदार सत्यजीत तांबे सन्मानित


संगमनेर : लोकशाहीचा महाकुंभ मेळा हा २०२४ या वर्षात भरणार आहे. १२७ पैकी ६४ देशात निवडणूक होणार आहेत. जगात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. लोकशाहीच्या उत्सवात युवकांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. युवकांचा सहभाग हा निवडणूक लढण्यापुरता मर्यादित नसून आपण राजकीयदृष्ट्या गंभीर कसे होऊ शकतो, याकडेही लक्ष दिले पाहिजे. राजकारणात युवकांनी सतर्क राहिले पाहिजे, असे प्रतिपादन नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांनी केले.


१३ वी भारतीय छात्र संसद गव्हर्निंग कौन्सिल आयोजित ‘आदर्श युवा आमदार सन्मान – २०२४’ कार्यक्रम बुधवारी पार पडला. पुणे येथील कोथरूड मधील एमआयटी-डब्ल्यूपीयुच्या स्वामी विवेकानंद सभा मंडपात कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आमदार सत्यजीत तांबें यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी आमदार तांबे बोलत होते.


यावेळी सत्यजीत तांबे यांनी आपल्या मनोगतात म्हंटले की, आज मला खूप आनंद होतोय, एमआयटीमध्ये मला आदर्श युवा विधायक सन्मान – २०२४ चा पुरस्कार दिला जात आहे. याच एमआयटीने विद्यार्थी राजकारणामध्ये प्रवेश दिला होता. एमआयटी ही एक व्हायब्रंट संघटना आहे. इथूनच माझ्या विद्यार्थी राजकारणाला सुरुवात झाली. एनएसयुआय, युथ काँग्रेस ते आमदार पदापर्यंत पोहोचलो. एमआयटी हे माझं कुटुंब आहे, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी

राष्ट्रीय सागरी मत्स्यव्यवसाय जनगणना २०२५ ला प्रारंभ

मुंबई : भारतातील सागरी मत्स्य व्यवसायाला अधिक बळकटी देण्यासाठी व मच्छीमार समुदायाच्या सर्वांगीण विकासासाठी

“आजच्या तुलनेत आठ महिन्यांनी होणारी कर्जमाफी अधिक फायद्याची” – बच्चू कडू

नागपूर : राज्यातील शेतकऱ्यांकडून तात्काळ कर्जमाफीची मागणी होत असताना, आजच्या तुलनेत 8 महिन्यांनी जाहीर होणारी

कार्तिकीसाठी राज्यातील विविध मार्गावरून ५५० एसटी बसेस धावणार

सोलापूर : सावळ्या विठ्ठलाचे भक्त असलेल्या वारकऱ्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाकडून सोलापूरसह सांगली, सातारा,