Health: दिवसभर झोप येत असते तर डाएटमधून आजच दूर करा या गोष्टी

  83

मुंबई: काही लोक तुम्ही पाहिले असतील की ते नेहमीच थकलेले असतात. असे लोक अनेकदा सततचा थकवा तसेच झोपेची वारंवार तक्रार करत असतात. तुमच्यासोबतही असेच होते. तुम्हीही सतत थकलेले आणि झोपेलेल असता का? याचे उत्तर जर हो असेल तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये खास बदल करावा लागेल. आरोग्य तज्ञांच्या मते आजच्या काळात डाएटमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या तुमच्या मानसिक आणि शारिरीक आरोग्यावर परिणाम करत आहेत. सततचा थकवा आणि झोपेपासून बचावासाठी काही गोष्टी डाएटमधून काढून टाकण्याची गरज आहे.



थकवा दूर करण्यासाठी खाऊ नका या गोष्टी


हाय शुगर फूड शरीरावर मोठा परिणाम करतात. याला डाएटमध्ये सामील केल्याने तुम्हाला इन्स्टंट एनर्जी मिळते मात्र ती एनर्जी लवकर संपते. ही साखर तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम करण्यास सुरूवात करते. अशातच डाएटमध्ये हाय शुगरवाले पदार्थ खाऊ नका.


रिफाईंड ब्रेड आणि धान्य यामुळे तुम्हाला सतत थकवा जाणवू शकतो. सफेद तांदूळ, सफेद ब्रेड, पास्ता यात फायबर कमी प्रमाणात असते. हे पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते. यामुळे शरीरात थकवा निर्माण होतो.


हाय फॅट फूड शरीरावर दीर्घकाळ वाईट परिणाम करतात. दरम्यान, पाहिले असता काही फॅट शरीरासाठी गरजेचे आहेत तर मात्र याच्या अतिरिक्त सेवनाने झोप आणि थकवा निर्माण होतो. तसेच हाय फॅट फूड पचवण्यासाठी शरीराला अधिक मेहनत करावी लागते.


फास्ट फूड आणि प्रोसेस्ड फूड सध्या मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र यामुळे शरीरास मोठे नुकसान पोहोचते. या पद्धतीच्या पदार्थामध्ये अनहेल्दी फॅटसोबत रिफाईंड कार्बोहायड्रेट आणि साखर मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व पदार्थ खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते. तसेच शरीरातील एनर्जी कमी होते.


आयर्नची कमतरता असलेले पदार्थही शरीराला नुकसान देतात. आरोग्य तज्ञांच्या मते आर्यन शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन सप्लाय करण्याचे काम करते. अशातच तुम्ही असे पदार्थ खाल ज्यात आयर्न नाही यामुळे शरीर अॅनिमियाची शिकार होऊ शकते.

Comments
Add Comment

Health: त्वचेसाठी वरदान आहे आवळा, दररोज खाल्ल्याने मिळतील हे फायदे

मुंबई : आवळा हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर फळ मानले जाते. 'सुपरफूड' म्हणून ओळखला जाणारा आवळा केवळ शरीरातील विविध

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या