५ दिवसांत वाढली इतकी मागणी, लक्षद्वीपला जाण्यासाठी सर्व फ्लाईट मार्चपर्यंत बुक

नवी दिल्ली: पीएम नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या लक्षद्वीप (Lakshadweep) दौऱ्यानंतर मालदीव (Maldives)च्या मंत्र्यांनी केलेल्या अपमानजनक ट्वीटनंतर झालेल्या वादादरम्यान केवळ ५ दिवसांतच लक्षद्वीपला जाणाऱ्या सर्व फ्लाईट्स मार्चपर्यंत बुक झाल्या आहेत.


देशातील आणखी एक पर्यटन स्थळ असलेल्या लक्षद्वीपला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या आयलँडचा दौरा केला होता. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचे गुगल सर्च वाढले होते. अनेक ट्रॅव्हल एजन्सीमध्येही लक्षद्वीपबाबतची चौकशी वाढली होती.


लक्षद्वीपसाठी केवळ एक एअरलाईन कंपनी अलायन्स एअर फ्लाईट चालवते. ही कंपनी केरळच्या कोची आणि लक्षद्वीपच्या अहत्तीद्वीप यांदरम्यान एअर सर्व्हिस चालवते. कोचीवरून अगत्तीला जाण्यासाठी एक तास तीन मिनिटांचा वेळ लागतो. एका मीडिया रिपोर्टनुसार ही कंपनी कोची आणि लक्षद्वीपल यांच्यात दररोज ७० ते ७२ सीट असलेल्या एटीआर ७२ विमानाला चालवण्याचे काम करते. कोच्ची-अगत्ती फ्लाईटचे मार्चपर्यंत तिकीच विकले आहेत.


लक्षद्वीपचा मुद्दा समोर आल्यानंतर याबद्दलची चर्चाही वाढली आहे. दरम्यान, तज्ञांच्या मते इतक्या वेगाने वाढणाऱ्या गर्दीला सांभाळताना लक्षद्वीपचा कमकुवत ढाचा सक्षम नाहीये. एकदा मोठ्या संख्येने लोक लक्षद्वीपला पोहोचल्यास तेथे अराजकता निर्माण होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन