Eggs : अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे ? जाणून घ्या नाहीतर...

  394

मुंबई: अंड्यामध्ये(egg) मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे तसेच प्रोटीन्स असतात. थंडी असो वा गर्मी अंडे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.अंड्यांना व्यवस्थित स्टोर केले पाहिजे. मात्र आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे तुम्ही किती वेळात खाल्ले पाहिेजे.


अनेकांना नाश्त्यात उकडलेली अंडी खायला आवडतात. काहीजण ऑम्लेट बनवून खातात. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या अंड्यांबद्दल सांगणार आहोत. उकडलेली अंडी किती वेळात खावीत. अंड्याला प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानले जाते. शरीराला फिट ठेवण्यासाठी दररोज अंडे खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही उकडलेली अंडी खायला आवडत असतील तर जाणून घ्या ती किती वेळात खावीत.



उकडलेल्या अंड्यांचे फायदे


आरोग्यासाठी अंडे चांगले मानले जाते. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. सोबतच यामुळे शरीराल एनर्जीही मिळते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, आर्यन, व्हिटामिन ए, बी६, बी१२, फोलेट, अमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनयम इसेन्शियल अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्च असतात. उकडलेले अंडे हे प्रोटीनचा मोठा स्त्रोत मानला जातो. नाश्त्यापासून ते स्नॅक्सफर्यंत सर्वांना अंडे खायला आवडते.



उकडलेले अंडे किती वेळात खावे?


अंड्याला दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते. आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे किती वेळात खावे? तुमच्या माहितीसाठी उकडलेले अंडे तुम्ही ५-७ दिवस स्टोर करू शकता. जर तुम्ही अंडे नरम उकडलेत तर ते २ दिवसांच्या आत खावे. उकडताना अंड्याचे कवच तुटले तर ते २-३ दिवसांत खावे नाहीतर ते खराब होते.



असे स्टोर करा उकडलेले अंडे


अंडी उकडल्यानंतर ती थंड पाण्यात ठेवा. जेव्हा ती थंड होतील तेव्हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्याचे पाणी सुकल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. अशा अंड्यांमध्ये बॅक्टेरिया होणार नाहीत.

Comments
Add Comment

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर