Eggs : अंडे उकडल्यानंतर किती वेळात खावे ? जाणून घ्या नाहीतर...

  440

मुंबई: अंड्यामध्ये(egg) मोठ्या प्रमाणात पोषक तत्वे तसेच प्रोटीन्स असतात. थंडी असो वा गर्मी अंडे हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते.अंड्यांना व्यवस्थित स्टोर केले पाहिजे. मात्र आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे तुम्ही किती वेळात खाल्ले पाहिेजे.


अनेकांना नाश्त्यात उकडलेली अंडी खायला आवडतात. काहीजण ऑम्लेट बनवून खातात. आज आम्ही तुम्हाला उकडलेल्या अंड्यांबद्दल सांगणार आहोत. उकडलेली अंडी किती वेळात खावीत. अंड्याला प्रोटीनचा चांगला स्त्रोत मानले जाते. शरीराला फिट ठेवण्यासाठी दररोज अंडे खाणे फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही उकडलेली अंडी खायला आवडत असतील तर जाणून घ्या ती किती वेळात खावीत.



उकडलेल्या अंड्यांचे फायदे


आरोग्यासाठी अंडे चांगले मानले जाते. यात मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. सोबतच यामुळे शरीराल एनर्जीही मिळते. अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन, आर्यन, व्हिटामिन ए, बी६, बी१२, फोलेट, अमिनो अॅसिड, फॉस्फरस आणि सेलेनयम इसेन्शियल अनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड्च असतात. उकडलेले अंडे हे प्रोटीनचा मोठा स्त्रोत मानला जातो. नाश्त्यापासून ते स्नॅक्सफर्यंत सर्वांना अंडे खायला आवडते.



उकडलेले अंडे किती वेळात खावे?


अंड्याला दीर्घकाळ फ्रेश ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवले जाते. आता असा सवाल आहे की उकडलेले अंडे किती वेळात खावे? तुमच्या माहितीसाठी उकडलेले अंडे तुम्ही ५-७ दिवस स्टोर करू शकता. जर तुम्ही अंडे नरम उकडलेत तर ते २ दिवसांच्या आत खावे. उकडताना अंड्याचे कवच तुटले तर ते २-३ दिवसांत खावे नाहीतर ते खराब होते.



असे स्टोर करा उकडलेले अंडे


अंडी उकडल्यानंतर ती थंड पाण्यात ठेवा. जेव्हा ती थंड होतील तेव्हा स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्याचे पाणी सुकल्यावर फ्रीजमध्ये ठेवा. अशा अंड्यांमध्ये बॅक्टेरिया होणार नाहीत.

Comments
Add Comment

Hair care: लांब आणि दाट केसांसाठी काय करावे? डॉक्टरांनी दिलेल्या 'या' टिप्स येतील उपयोगी!

मुंबई: आजच्या काळात केस गळणे किंवा केसांचे आरोग्य बिघडणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. प्रत्येकाला लांब, दाट आणि

रक्षाबंधन २०२५: रक्षाबंधनाच्या सणाचा गोडवा वाढवण्यासाठी जरूर ट्राय करा 'या' ३ हेल्दी मिठाई

मुंबई: रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे, जो गोड पदार्थांशिवाय अपूर्ण आहे. परंतु, आरोग्याच्या

हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहारात हे बदल नक्की करा

मुंबई : आजकाल भारतात हृदयरोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. अगदी तरुण वयातच हृदयरोगाने मृत्यू झाल्याची बरीचशी उदाहरणे

Uric Acid: शरीराकडून मिळतात 'हे' धोकादायक संकेत, वेळीच लक्ष द्या अन्यथा वाढू शकतात गंभीर समस्या!

मुंबई : आजकाल उच्च युरिक अ‍ॅसिड (High Uric Acid) ही एक सामान्य समस्या बनली आहे, जी गंभीर आरोग्य समस्यांना आमंत्रण देऊ शकते.

Weight Loss: व्यायाम आणि डाएट न करताही वजन करा कमी, लक्षात ठेवा या ३ गोष्टी

मुंबई: आजच्या काळात वाढलेले वजन ही अनेकांसाठी एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळ्या

धोक्याची घंटा! भारतात ५ वर्षांत हृदयरोगाचे प्रमाण ५० टक्क्यांनी का वाढले?

मागील ५ वर्षांत हृदयरोगाच्या औषधांची मागणी ५० टक्क्यांनी वाढली; तरुणही धोक्यात! मुंबई : गेल्या पाच वर्षांत